मुंबईः उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १५ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली. मोठ्या संख्येने भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहे. मात्र, कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबल उडाली आहे. या दुर्वेवी घटनेत १७ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ५० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात पुढील उपाचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्वेवी घटनेनंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली असून कुंभमेळ्याच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भाविकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे हे. आज १० जणांचा जीव गेला आहे. त्यानंतर तातडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान लक्ष ठेऊन आहे, म्हणजे नेमकं काय? त्याने नागरिकांचे प्राण परत येणार आहेत का? आज अनेक कुंभमेळ्यात अनेकजण रस्त्यावर झोपत आहेत. त्यांची व्यवस्था झालेली नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे. तेव्हाचे मुख्यमंत्री पूर्णवेळ उपस्थित होते १९५४ साली जो कुंभमेळा झाला, त्याची व्यवस्था बघा. तेव्हा नेहरूंनी कुंभमेळ्याचा दौरा केला होता. तेव्हाचे मुख्यमंत्री पूर्णवेळ उपस्थित होते. पण त्यांनी राजकीय भांडवल करण्यासाठी कुंभाचे आयोजन केले नव्हते, असा टोला संजय राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सरकारवर लगावला आहे. तसेच कुंभमेळ्याच्या आयोजनात भष्ट्राचार झाल्याचा आरोप देखील राऊतांनी केला आहे. कुंभमेळ्यातील १० हजार कोटी कुठे खर्च झाले? कुठे गेले पैसे? योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असते तर एवढा मोठा अपघात झाला नसता. यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल केला पाहिजे? असा सवाल राऊतांनी केला आहे. त्यासाठी मुलुंडच्या पोपटलालने प्रयागराजला जायला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. कुंभमेळ्यातील ती घटना कशी घडली? मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानाचे आयोजन गंगा किनारी करण्यात आले. या ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी झाली. त्यातच चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १७ भाविकांना आपला जीव गमावला लागला. तर अनेक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयत उपचार केले जात आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. खा. संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारला या घटनेवरून लक्ष्य केले आहे.