Kapil Dev Advice : “टी-२० सोडा अन् आधी रणजी खेळा!”; भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोवर कपिल देव संतापले; बीसीसीआयला दिला थेट इशारा
Kapil Dev Advice : भारताचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी खेळाडूंना आणि बीसीसीआयला मोलाचा सल्ला दिला आहे.

Kapil Dev Advice Indian Batsmen Spin Bowling Domestic Cricket Multi Day Matches : अलिकडच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांची फिरकी गोलंदाजीसमोर झालेली दाणादाण पाहून भारताचे माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी खेळाडूंना आणि बीसीसीआयला मोलाचा सल्ला दिला आहे. भारतीय फलंदाजांनी आपल्या फिरकीविरुद्धच्या कौशल्याला धार देण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट आणि बहुदिवसीय सामने खेळणे अत्यंत आवश्यक असल्याचे कपिल देव यांनी म्हटले आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये भारतीय फलंदाज फिरकी चेंडूंवर चाचपडताना दिसले होते.
कपिल देव यांनी दिला महत्त्वाचा सल्ला –
कपिल देव यांच्या मते, फिरकीविरुद्ध भारतीय संघाच्या खराब कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे सीनियर खेळाडूंचे देशांतर्गत क्रिकेटकडे होणारे दुर्लक्ष हेच आहे. बंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले, “सीनियर खेळाडू जास्त घरगुती क्रिकेट खेळत नसल्यामुळेच फिरकीविरुद्ध अडचण येत आहे. येथे बीसीसीआयने कडक भूमिका घेतली पाहिजे आणि प्रत्येकासाठी बहुदिवसीय सामने खेळणे अनिवार्य केले पाहिजे. यामुळे अनुभवी खेळाडूंचा सराव तर होईलच, शिवाय युवा पिढीलाही या दिग्गज खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळेल.”
कसोटी क्रिकेट हे एक वेगळेच आव्हान –
“They play too many T20Is and ODIs” – World Cup-winning captain Kapil Dev opens up on India’s spin struggles
Kapil Dev said:
“India recently have not been at their best against spin bowling because they play too many T20s and One-Dayers. Test cricket is a different ball game… pic.twitter.com/lF9pTtXtsX
— Cricket Hub (@Anurag9793) August 12, 2026
भारताचे वरिष्ठ खेळाडू टी-२० आणि एकदिवसीय सामने खूप खेळतात, पण कसोटी क्रिकेट हे एक वेगळेच आव्हान असते, याकडेही कपिल देव यांनी लक्ष वेधले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांसारख्या दिग्गजांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे युवा फलंदाजांची फिरकीविरुद्धची कमजोरी स्पष्टपणे उघडी पडली आहे. बीसीसीआयने कठोर पावले उचलल्यास या समस्येवर लवकरच तोडगा निघू शकतो, अशी आशा कपिल देव यांनी व्यक्त केली.
श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची कसोटी –
दरम्यान, भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून शनिवारपासून गॉल येथे दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेने आपला १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. धनंजय डी सिल्व्हाच्या कप्तानीत खेळणाऱ्या या संघात ३ वर्षांनंतर यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाचे पुनरागमन झाले असून, ऑफ-स्पिनर केशारा नुवांथाला पहिल्यांदाच संघात स्थान मिळाले आहे. कामिंदू मेंडिस उपकर्णधाराची भूमिका बजावणार असून, प्रभात जयसूर्याचा फिरकी मारा भारतीय फलंदाजांची कसोटी पाहणार आहे.





