Hindu Marriage Act| अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणात हिंदू विवाहाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. हिंदु विवाह सोहळ्यात ‘सप्तपदी’ अत्यावश्यक सोहळा आहे, कन्यादान नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टाने केली आहे. लखनौच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या आशुतोष यादव नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.
या खटल्यात दोन साक्षीदारांना बोलावण्यासाठी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या विवाह प्रमाणपत्रात हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह सोहळा पार पडला होता, त्यानुसार कन्यादान हा अत्यावश्यक विधी आहे, असा उल्लेख करत याचिकाकर्त्याचा दावा होता.
काय म्हंटले अलाहाबाद उच्च न्यायालयाने ? Hindu Marriage Act|
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना म्हटलं आहे की, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत सप्तपदीची आवश्यकता असते, कन्यादानाची आवश्यकता नसते. अलाहाबाद हायकोर्टाने ही महत्त्वाची टिपण्णी केली आहे. आशुतोष यादव यांनी सासरच्यांनी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात 6 मार्च रोजी लखनौच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशाला आव्हान दिलं होतं. कायद्यानुसार त्यांच्या लग्नासाठी ‘कन्यादान’ सोहळा अनिवार्य होता, तो पार पडला नाही, असं त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं होतं.
यावर न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या एक पीठाने या प्रकरणावर भाष्य करताना, उच्च न्यायालयाने खटल्यातील साक्षीदारांना बोलावण्याची याचिका फेटाळली आहे. विवाह संपन्न होण्यासाठी कन्यादान विधी आवश्यक नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
हिंदू विवाह कायद्यांतर्गत, विवाह सोहळ्यासाठी ‘कन्यादान’ आवश्यक नसल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. हिंदू विवाह कायद्या अंतर्गत, सप्तपदी हाच अत्यावश्यक विधी आहे, असे निरीक्षण लखनौ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आशुतोष यादव यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना नोंदवले.
हेही वाचा :
गुढीपाडव्याला सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवे दर