Chhatrapati Sambhajinagar : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात कलश मिरवणूक
कलश पूजनानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश वितरण सोहळा पार पडला.

Chhatrapati Sambhajinagar : जगतगुरू संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गुरु रविदास समरसता संकल्प अभियाना’चा प्रारंभ शहरातील कासलीवाल गार्डन येथे भव्य कलश पूजन व रथ मिरवणुकीने करण्यात आला. समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा विचार जनमानसांपर्यंत पोहचविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
कलश पूजनानंतर शहरातून काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच महंत नागराज बाबांचे शिष्य महंत दिवाकर बाबाजी, संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी, वीर शौर्य संप्रदायाचे डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्यासह विविध संप्रदायांचे संत-महंत, महाराज आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
यावेळी, बोलतांना भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी सांगितले की, “संत रविदास महाराज यांचे समता, समरसता, बंधुता, न्याय हे विचार ६५० वर्षांपूर्वी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलेले न्याय, स्वातंत्र्य, समानता या मूल्यांची पेरणी संत रविदास महाराजांनी ६५० वर्षांपूर्वी केली होती. संत रविदास यांनी समता, श्रमप्रतिष्ठा व मानवतेचा मार्ग दाखविला असून, त्यांचे हे विचार घराघरांत पोहोचविण्याकार्य समरसता संकल्प अभियान करेल.” असे ही ते यावेळी बोलतांना म्हणाले.





