Manoj Jarange : पोरांनी चांगलं वातावरण पेटवलं..! ‘Cockroach Janta Party’ च्या आंदोलनाला जरांगेंचा पाठिंबा, घेणार मोठा निर्णय….
या संपूर्ण घडामोडींमुळे 6 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाकडे आणि त्यावरील सरकारच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Cockroach Janta Party | Manoj Jarange Patil : राजकीय वर्तुळात सध्या “कॉकरोच जनता पार्टी”चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या प्रस्तावित आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके हे परदेशातून भारतात दाखल होणार असून येत्या 6 जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
या आंदोलनासाठी त्यांनी तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे दिल्लीत कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange)
दरम्यान, या घडामोडींवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही मोठे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “त्या पोरांनी चांगलं वातावरण पेटवलं आहे, ही खदखद आणि असंतोष आहे.” तसेच, सरकारने लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असा सूचक सल्लाही त्यांनी दिला. (Manoj Jarange)
जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले की, दादागिरी आणि पैशाच्या जोरावर फार काळ परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नाही. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकार कोणतेही असो, पण कामकाजात पारदर्शकता आणि निर्णयांची अंमलबजावणी जलद व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करू नये, अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Manoj Jarange)
या संपूर्ण घडामोडींमुळे 6 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाकडे आणि त्यावरील सरकारच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले का? (Manoj Jarange)
सरकार कोणाचे असू द्या, महायुतीचं असू द्या नाही तर महाविकास आघाडीचा असू द्या. काम नाही केल्यावर कठोर भूमिका घेणार असा इशारा त्यांनी दिला. एक आदेश काढणार आणि समाधानी करणार हे जमणार नाही, बाकीचे लटकून ठेवणार हे जमणार नाही.
58 लाख नोंदी सापडलल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या व्हॅलिडीटी द्या याचे कडक आदेश काढले पाहिजे. नसता कारवाई करण्यात येईल, टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना कणाकण घरी पाठवलं पाहिजे, सरकार पेक्षा अधिकारी मोठे झाले का? असा खडा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.





