लॉकडाऊनबाबत सध्या भाष्य करणं योग्य राहणार नाही – जयंत पाटील

Updated On:

मुंबई – लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम जाणवत असून कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात चांगला फायदा झाला आहे. बर्‍याच ठिकाणी उपलब्ध सुविधा आता पुरायला लागल्या आहेत, एवढी रुग्ण संख्या कमी झाली आहे. पण याचा अर्थ लॉकडाऊन कायम ठेवला पाहिजे, असाही नाही, शेवटी लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे.

मात्र लॉकडाऊनबाबत सध्या भाष्य करणं योग्य राहणार नाही. कोरोना स्थितीबाबत मंत्रिमंडळाची दर आठवड्याला चर्चा होते आणि त्याप्रमाणे आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यात फिरण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. हा निर्णय केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात फिरण्याऐवजी दिल्लीत फिरले तर उपयोग होईल, असा टोला जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

आणखी संबंधित बातम्या

NCP Merge : मोठी घडामोड..! दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर मोठा निर्णय; बैठकीत काय काय घडलं?

2026-05-20 17:10:49

NCP Merge : मोठी घडामोड..! दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर मोठा निर्णय; बैठकीत काय काय घडलं?

Sangli Politics : सांगलीमध्ये जयंत पाटलांना चेकमेट! 'या' 2 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

2026-05-19 22:47:08

Sangli Politics : सांगलीमध्ये जयंत पाटलांना चेकमेट! 'या' 2 बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक; तटकरेनंतर आता पटेलांनीही घेतली 'साहेबांची' भेट?

2026-05-16 16:11:01

Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक; तटकरेनंतर आता पटेलांनीही घेतली 'साहेबांची' भेट?

Jayant Patil : जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केली 'ही' मागणी

2026-05-15 11:26:04

Jayant Patil : जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केली 'ही' मागणी