Mallikarjun Kharge : मतदारसंघ फेररचनेचा मुद्दा तापणार; सर्वपक्षीय बैठकीसाठी खर्गेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे बळावली आहेत. कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.

Mallikarjun Kharge – मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे बळावली आहेत. कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
मी मार्च-एप्रिलमध्ये संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांना पत्रं पाठवून सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली. दुर्दैवाने ती मान्य करण्यात आली नाही. त्यावेळी १३१ व्या घटनादुरूस्तीशी संबंधित विधेयक लोकसभेत आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत प्राप्त करू शकले नाही.
आता सुधारित विधेयक आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती बातम्यांमधून मिळत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती मी आपणास करत आहे.
मतदारसंघ फेररचनेशी संबंधित सुधारित प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळावा, अशी भूमिका खर्गे यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रातून मांडली आहे.





