Irfan Pathan : आयपीएल २०२५ च्या कॅामेंट्री पॅनलमधून इरफान पठाणला काढून टाकण्यात आले असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून क्रीडाविश्वात रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलं होतं की इरफानने काही खेळाडूंवर खूप टीका केली होती, ज्यामुळे त्याला कॅामेंट्री करता आली नाही. मात्र, ही गोष्ट खरी आहे का, याबाबत आता स्वतः इरफान पठाणने मोठा खुलासा करत यामागचं खरं कारण सांगितलं आहे. नुकतंच त्याने लल्लनटॅाप वाहिनीला मुलाखत दिली, त्यावेळी त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. इरफानला आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्मावर टीका केली म्हणून काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला यावर बोलताना इरफान म्हणाला, काय घडत आहे, ते का घडत आहे,. जे घडू शकते ते का आणि कसे घडू शकते. हे कॅामेंट्री करणाऱ्याचं काम आहे. जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल तर त्याची स्तुती करणे, पण जर तो चांगली कामगिरी करू शकत नसेल त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे, असं त्याने स्पष्ट केलं आहे. कॅामेंट्री करणाऱ्याची जबाबदारी खेळाडूसाठी नाही तर चाहत्यांची असते असंही त्याने सांगितलं. रोहितचं केलं कौतुक यानंतर इरफानने रोहित शर्मा विषयी भाष्य केलं. तो म्हणाला, रोहित शर्मा एक चांगला खेळाडू असल्याचं त्याने सांगितलं. इरफान रोहितला पाठिंबा दिला आहे. तर, इरफानचा असा विश्वास आहे की तो फक्त प्रसारक म्हणून त्याचे काम करतो. यामुळे आता गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. हेही वाचा :नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांचे निधन; डोक्याला मार लागल्याने सुरु होते उपचार