India Afghanistan Series : बांगलादेशला बीसीसीआयचा मोठा धक्का? भारत अन् अफगाणिस्तान टी-२० मालिकेची अधिकृत घोषणा
India Afghanistan Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

India Afghanistan T20 Series Announced September 2026 Delhi Arun Jaitley Stadium : एकीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) भारतीय संघाच्या यजमानपदाची वाट पाहत असतानाच, आता एका मोठ्या घडामोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, याच काळात भारतीय संघाचा बांगलादेश दौरा प्रस्तावित होता. त्यामुळे आता टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत रंगणार टी-२० मालिकेचा महासंग्राम!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. विशेष म्हणजे या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे असेल, कारण भारताने अफगाणिस्तानला दिल्लीतील हे मैदान ‘होम ग्राऊंड’ (Home Ground) म्हणून दिलेले आहे.
टी-२० विश्वचषकातील वाद अन् बीसीबीला मोठा फटका!
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारताला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जायचे होते. मात्र, बीसीसीआयने (BCCI) अद्याप या दौऱ्याला मंजुरी दिलेली नाही.
🚨 NEWS 🚨
Afghanistan to host India for three-match T20I series in Delhi.
Read more: https://t.co/qRaeB72pjG#TeamIndia | #AFGvIND | @ACBofficials pic.twitter.com/mxsR5YqLw9
— BCCI (@BCCI) August 12, 2026
टी-२० विश्वचषक २०२६ दरम्यान बांगलादेशने पाकिस्तानच्या बहकाव्यात येऊन भारतात सामने खेळण्यास नकार दिला होता. परिणामी आयसीसीने बांगलादेशला विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. तेव्हापासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. याच भूमिकेचा फटका आता बांगलादेशला बसला असून, भारताने बांगलादेशऐवजी अफगाणिस्तानसोबत मालिका खेळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
टी-२०मालिकेचे वेळापत्रक:
- पहिला टी-२० सामना: १३ सप्टेंबर
- दुसरा टी-२० सामना: १५ सप्टेंबर
- तिसरा टी-२० सामना: १७ सप्टेंबर





