IND Vs ENG 4th Test (Ranchi) : – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज बनला आहे. या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची भारताला संधी आहे. तर दुसरीकडे ही कसोटी जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरा करण्यासाठी इंग्लंडचा संघ कसून सराव करत आहे. या मालिकेत सध्या यजमान भारतीय संघ २-१ असा आघाडीवर आहे. – इंग्लंडचा बॅजबॉल अपयशी ठरत आहे – कर्णधार स्टोक्ससह प्रमुख फलंदाजांच्या अपयशाने चिंता – गोलंदाजीत अंडरसनही फिका पडला आहे – भारताला मधल्या फळीची चिंता – जयस्वालकडून अपेक्षा वाढल्या – खेळपट्टीचे स्वरुप पाहता फिरकी सत्ता गाजवेल भारताच्या फलंदाजीबाबत बोलायचे तर मधल्या फळीत सर्फराज खानचा समावेश केल्याने फलंदाजी भक्कम बनली आहे. मात्र, रजत पाटीदारने निराशा केल्याने त्याला संघातून बाहेर बतवून देवदत्त पडीक्कलला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच रांचीच्या खेळपट्टीचा इतिहास पाहता फिरकीला साथ मिलथ असल्याने भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता जास्त आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात चांगली खेळी केली होती मात्र, अद्याप त्याच्याकडून मोठी खेळी झालेली नाही. तसेच शुभमन गिलनेही या कसोटीत धावा केल्यामुळे त्याच्याकडूनही आता चौथ्या कसोटीत मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. सध्यातरी भारताची फलंदाज प्रमाख्याने यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा व सर्फराज खान यांच्यावर अवलंबून आहे. गोलंदाजीत महंमद सिराज या एकाच वेगवान गोलंदाजालाच खेळवले जाणार असल्याचे चित्र आहे. संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश झाला तर रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव यांच्या जोडीला अक्सर पटेललाही संधी मिळू शकते. इंग्लंड संघाची ताकद पाहता त्यांना जॅक लीचची णिव भासणार आहे. त्यांचे नामवंत फलंदाज जॉनी बेएरस्टो, ज्यो रुट सातत्याने अपयशी ठरत असल्याचे त्यांच्या गोटात चिंता आहे. त्यांचा कर्णधार बेन स्टोक्सही धावा करत असला तरीही त्याचे नेतृत्व व वैयक्तीक कामगिरी फारशी चमकदार ठरलेली नाही. त्यांची गोलंदाजी देखील जेम्स अंडरसन असतानाही दुबळी वाटत आहे. रेहान अहमद व ज्यो रूट यांच्यासह टॉम हर्टली हे फिरकी गोलंदाज संघात राहतील मात्र, रूट हा पार्टटाइम गोलंदाज आहे. या तिघांची फिरकी गोलंदाजी खेळणे भारतीय संघासाठी कठीण नाही. मात्र, त्यासाठी भारताला भक्कम सलामीची गरज आहे. इंग्लंडचे जॅक क्राऊली, ओली पोल वबेन डकेट भरात आहेत मात्र, तरीही त्यांना अपेक्षीत सलामी मिळालेली नाही. IND vs ENG 4th Test : बुमराहला रांची कसोटी खेळायची होती इच्छा, पण ‘या’ कारणामुळे नाही मिळालं प्लेइंग-11 मध्ये स्थान… मधल्या फळीत रूट सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्यांना मधल्या फळीत एका भक्कम फलंदाजाकडून मोठ्या खेळीची गरज आहे. त्यामुळेच सध्या दोन्ही संघांचे बलाबल पाहता भारतीय संघाची बाजू जास्त वरचढ दिसत असून घरच्या मैदानावर खेळण्याचाही लाभ त्यांना होणार आहे. गिलचे अपयश दूर होणार का भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने तिसर्या कसोटीत चांगली खेळी केली होती मात्र, त्याचे शतक हुकले होते. त्यापूर्वीच्या दोन्ही कसोटीत त्याला अपयश आले होते. आता संघातील स्थान टीकवायचे असेल तर त्याला या चौथ्या कसोटीत धावा करणे गरजेचे आहे. अन्यथा पाचव्या कसोटीतून त्याला बाहेरचा रस्त दाखवला जाऊ शकतो.