Live Cricket Score Today IND vs ENG 2nd Test Day 2 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे पहिल्या डावात 396 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या.
Innings Break!
England are all-out for 2⃣5⃣3⃣
6⃣ wickets for vice-captain @Jaspritbumrah93
3⃣ wickets for @imkuldeep18
1⃣ wicket for @akshar2026Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/wb4s7EXIuu
— BCCI (@BCCI) February 3, 2024
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीला इंग्लिश फलंदाजांकडे उत्तर नव्हते. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या 6 फलंदाजांना बाद केले. याशिवाय कुलदीप यादवने 3 बळी घेतले. अक्षर पटेलला 1 यश मिळाले.
Jasprit Bumrah’s sensational 6/45 makes him the fastest Indian pacer to 150 Test wickets 👊#WTC25 #INDvENG pic.twitter.com/nPLIEqNyZs
— ICC (@ICC) February 3, 2024
याआधी भारताचा डाव 396 धावांवर आटोपला होता. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. बेन डकेटने 21 धावा केल्या. यानंतर 114 धावांच्या स्कोअरवर ब्रिटिशांना दुसरा धक्का बसला. जॅक क्रॉली 76 धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. जॅक क्रॉलीनंतर इंग्लिश फलंदाजांची सतत पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया सुरू झाली.
इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने 47 धावांची खेळी केली. मात्र उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. इंग्लिश फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. ऑली पोप, जॉनी बेअरस्टो आणि बेन फॉक्ससारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले.
IND vs ENG 2nd Test Day 2 : यशस्वीचे शानदार द्विशतक; भारताचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला…
याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 396 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 209 धावा केल्या. मात्र याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा गाठता आला नाही. इंग्लंडकडून जिमी अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. हैदराबाद कसोटीचा नायक टॉम हार्टलीला केवळ 1 यश मिळाले.