टी-२० विश्वचषकाचा ३५ वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात अॅडलेडमध्ये खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. त्यामुळे आता बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून केएल राहुलने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत ३० धावा फटकावल्या. तर विराट कोहलीने ४४ चेंडूत १ षटकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ६४ धावा केल्या. याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशकडून हसन महमूदने ३ तर शकिब अल हसनने २ बळी घेतले.
India finish strongly to set Bangladesh a target of 185 🔥
Who is winning?#T20WorldCup | #INDvBAN | 📝: https://t.co/vDRjKeeGvf pic.twitter.com/iLVp1UT35p
— ICC (@ICC) November 2, 2022
दोन्ही देशांच्या प्लेइंग इलेव्हन
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
बांगलादेश – नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, शोरीफिलू इस्लाम, नुरुल हसन (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद.