“गुजरातचा मुख्यमंत्री असताना सर्वसामान्यांशी भेटता येत होते,परंतु दिल्लीत आल्यावर…” शंभराव्या भागात PM मोदींनी सांगितले ‘मन की बात’चे महत्व

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज रविवारी 30 एप्रिल रोजी प्रसारित झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी झालेल्या मन कि बातमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. मन कि बातद्वारे शेकडो महिलांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्यांला पुढे आणले म्हणूनच अनेक महिलांचे कार्य सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहचले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितला.
मेरे प्यारे देशवासियो या शब्दांनी सुरुवात करत पंतपधान मोदी म्हणाले,”या कार्यक्रमामुळे मी तुमच्यापासून कधीच दूर जाऊ शकलो नाही. मला आठवतंय मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वसामान्य लोकांशी भेटता येत होते., परंतु २०१४ मध्ये दिल्लीत आल्यावर येथील परिस्थिती वेगळी असलयाचे जाणवले. सुरुवातीच्या काळात मला एकटे वाटत होतो. जनतेपासून दूर आल्यासारखे वाटत होते. मन कि बात ने मला सर्वसामान्यांशी जोडण्याचे व्यासपीठ मिळाले. प्रोटोकॉल आणि पदभार व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिले आणि मी कोटी कोटी जनतेशी जोडले गेलो. प्रत्येक महिलण्याला मी हजारो देशवासीयांची संदेश ऐकतो असं देखील यावेळी मोदी म्हणाले.
मन कि बातद्वारे पंतप्रधानांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याच मन कि बातचा आज शंभरावा भाग प्रसारित झाला. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही प्रसारित करण्यात आला. या खास प्रसंगी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.गेट्स यांनी एक ट्विट करत पंतप्रधांना या भागासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
न्यूयॉर्क,आणि लंडनमध्येही ‘मन की बात’ प्रसारित
मन की बातचा हा ऐतिहासिक भाग न्यूयॉर्कमध्येही ऐकायला मिळणार आहे. हा कार्यक्रम स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता प्रसारित केला जाईल. रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐतिहासिक ठरणार आहे. लंडनमध्येही हा कार्यक्रम ऐकता येणार आहे.





