Devendra Fadnavis – आज ज्या ठिकाणी मतदान झाले आहे, त्या ठिकाणची मतमोजणी देखील 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोग व न्यायालये या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत, आणि त्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र मला तरी आज घेण्यात आलेला निर्णय अयोग्य वाटतो, असे म्हणताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक राज्यामध्ये सुरु असताना, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूरच्या खंडपीठाने झालेल्या निवडणूकांचे निकाल राखून ठेवण्याचा निर्णय दिला. रखडलेल्या स्थानिकच्या निवडणूका 20 डिसेंबरला होणार आहेत. त्यानंतर दोन्ही निवडणूकांची एकत्रच मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, मतदान समितीचे वकिल नक्की कोण आहेत, याची माझ्याकडे माहिती नाही. मात्र आज जे काही घडले, ते पूर्णपणे बरोबर नाही. त्यामुळे मला तरी ते पूर्णपणे अयोग्य वाटते. औपचारिकपणे जाही केलेल्या निवडणूकांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ असावी. या निर्णयामुळे प्रामाणिक असलेल्या राजकिय कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण झाली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. कायद्याचा चुकीचा अर्थ काढला कार्यकर्त्यांची कोणतीही चूक नसताना, त्यांना या व्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. मला वाटते की, राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा, कायद्याचा चुकीचा अर्थ काढण्यावर आधारित आहे. कोणीतरी न्यायालयात जातो, त्याला दिलासा मिळत नाही. मात्र दुसरा कुणीतरी न्यायालयात गेल्यामुळेच निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अशा निवडणूकींच्या प्रक्रिया निवडणूक आयोग दुरुस्त करेल, अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवली.