टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) स्पर्धेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या या स्पर्धेचे यजमान पद ऑस्ट्रेलियाकडे असल्याने आता सर्वच सहभागी संघ तेथे पोहोचले आहेत. स्पर्धा ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर होत असल्य्याने कांगारूंना विजेतेपदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहे. भारतीय संघ देखील काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्याचबरोबर भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दोन सराव सामनेही खेळले आहेत. पहिला सामना भारताने जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला.
भारतीय संघाला स्पर्धेतील पहिलाच सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी खेळाचा आहे. त्यापूर्वी १६ ऑक्टोबर पासून स्पर्धेतील पात्रता सामने खेळवले जातील. त्यानंतर सुपर-१२ चे सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत उतरणार असून भारत वासियांना संघाकडून विजेतेपद जिंकण्याची आशा आहे. याअगोदर भारताने २००७ मध्ये पहिल्याच टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. तेव्हापासून भारताला या स्पर्धेत दुसऱ्या विजेतेपदाची वाट पाहावी लागत आहे.
#T20WorldCup : सराव सामन्यातच टीम इंडिया पराभूत, वर्ल्डकपमध्ये तर काय होणार देवालाच माहित?
टी-२० विश्वचषकाच्या ( T20 World Cup ) इतिहासात भारताच्या विराट कोहलीच्या ( Virat Kohli ) नावावर मोठ्या विक्रमांची नोंद आहे. विराट आशिया चषकात चांगल्याच लयीत असल्याचे पाहायला मिळाले. त्याने या स्पर्धेत भरपूर धावा काढल्या आणि टी-२० प्रकारातील पहिले शकत देखील ठोकले होते. त्याच्या याच कामगिरीची पुनरावृत्ती आता विश्वचषक स्पर्धेत होणे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे. विराट ( Virat Kohli ) हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने टी-२० विश्वचषकात ( T20 World Cup ) दोन वेळा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार जिंकला आहे. यामध्ये २०१४ आणि २०१६ टी-२० विश्वचषकमध्ये ( T20 World Cup ) त्याने आपल्या फलंदाजीत दमदार कामगिरी केली होती.
टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) इतिहासात विराटची कामगिरी
विराट कोहलीने ( Virat Kohli ) भारतासाठी आतापर्यंत चार टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) खेळले आहेत. २०१२ मध्ये तो पहिल्यांदा टी-२० विश्वचषक खेळला होता. यानंतर २०१४ आणि २०१६ मध्ये विराट कोहलीच्या ( Virat Kohli ) बॅटने विरोधी संघांच्या गोलंदाजांचे चांगलेच हाल केले होते. या दोन्ही वर्षांमध्ये विराटला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळेच दोन वेळा हा पुरस्कार जिंकणारा विराट कोहली ( Virat Kohli ) जगातील पहिला खेळाडू ठरला. अशी कामगिरी त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही.
द.आफ्रिकेचाच ‘हा’ माजी खेळाडू म्हणतोय, “सूर्यकुमार यादव भारताचा एबी डिव्हिलियर्स…”
टी-२० विश्वचषकात ( T20 World Cup ) ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार जिंकणारे खेळाडू
२००७ : शाहिद आफ्रिदी (१२ विकेट आणि ९१ धावा)
२००९ : तिलकरत्ने दिलशान (३१७ धावा)
२०१० : केविन पीटरसन (२४८ धावा)
२०१२ : शेन वॉटसन (२४९ धावा आणि ११ विकेट)
२०१४ : विराट कोहली ( Virat Kohli ) (३१९ धावा)
२०१६ : विराट कोहली ( Virat Kohli ) (२७३ धावा)
२०२१ : डेव्हिड वॉर्नर (२८९ धावा)