Himanta Biswa Sarma : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेचा टप्पा” हळूहळू पुढे सरकत असून सध्या ही यात्रा आसाममध्ये पोहचली आहे. दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री हे या राज्यांत आहे असे म्हणत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधींच्या टीकेला आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. याविषयी बोलताना सरमा यांनी,”गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ही राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ नसून ‘मियाँ यात्रा’ आहे” असे म्हटले आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते जातात. ‘मियां’ हा मूलतः आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.
असम पहुंच कर उतना ही प्यार मिला जितना मणिपुर और नागालैंड के लोगों से मिला था।
हमारी इस यात्रा का लक्ष्य आपकी पीड़ा, आपके मुद्दों और आपके साथ हो रहे भयंकर अन्याय को करीब से समझना है।
असम सरकार भाजपा रूपी ‘नफ़रत की खाद’ से उपजी ‘भ्रष्टाचार की फसल’ है।
असम का मुख्यमंत्री… pic.twitter.com/WXPKJaFPFQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2024
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत या संदर्भात भाष्य केले होते. त्यांनी म्हटलं की, जेवढं प्रेम आम्हाला मणिपूर आणि नागालँडच्या लोकांकडून मिळालं. आमच्या या यात्रेचा मुख्य उद्देश हा तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न आणि तुमच्यावर होत असलेल्या अन्याय जवळून समजावून घेण्यासाठी आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना त्यांनी म्हटलं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री हे या राज्यांत आहे.” असे म्हटले होते.
राहुल गांधी यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, आसाम सरकार हे भाजपच्या रूपाने द्वेषाच्या खतातून जन्माला आलेले भ्रष्टाचाराचे पीक आहे. आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे काम केवळ द्वेषाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटणे आहे. पैशाची ताकद आसामच्या लोकांच्या शक्तीला कधीही पराभूत करू शकत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले होते.