धक्कादायक…! उष्णतेच्या लाटेने 19 दिवसांत 192 जणांचा मृत्यू

Heat Waves | जे लोक बेघर आहे, किंवा फूटपाथवर रात्र घालवतात त्यांच्यासाठी उष्माघातात राहणे अधिक कठीण आहे. एका अहवालानुसार, ’11 ते 19 जून 2024 दरम्यान दिल्लीत उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे 192 बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.’ उष्णतेच्या लाटेमुळे बेघर लोकांच्या समस्या वाढत आहे.
त्यांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळत नाही. उदाहरणार्थ, आरोग्य सुविधा, कूलर, एसी, उष्णता टाळण्यासाठी पंखे. यामुळे बेघर लोकांना उष्णतेशी संबंधित आरोग्य समस्या जसे की थकवा, उष्माघात आणि डिहायड्रेशनचा सामना करावा लागतो. त्यांना आश्रय देण्यासाठी बांधलेली निवारे अनेकदा क्षमता आणि सुविधांच्या बाबतीत कमी पडतात. त्यामुळे हवामानातील बदलांचा त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होतो. प्रचंड उकाडा आणि थंडीत परिस्थिती आणखीनच बिकट होते.
Heat Waves |सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (CHD) नावाच्या एनजीओचे कार्यकारी संचालक सुनील कुमार अलेदिया यांनी सांगितले…
‘दिल्लीमध्ये 11 ते 19 जून 2024 दरम्यान उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे 192 बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे.’ गेल्या वर्षी 11 जून ते 19 जून या कालावधीच्या तुलनेत 2024 मधील मृत्यूंची संख्या खूप जास्त आहे. अनोळखी मृतदेहांपैकी 80 टक्के मृतदेह बेघर लोकांचे आहेत.’
वर्ष मृत्यु
2019 – 143
2020 – 124
2021 – 58
2022 – 150
2023 – 75
2024 – 192
Heat Waves | तापमान वाढण्याचे कारण काय ?
वायू प्रदूषण, जलद औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे वाढत्या तापमानामुळे बेघर लोकांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हे देखील एक मोठे आव्हान आहे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि त्यासंबंधीचे इतर आजार होत आहे. याशिवाय उष्णतेमुळे जुनाट आजार आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या ऋतूत जुनाट आजार वाढतात. पैशांच्या कमतरतेमुळे, बरेच बेघर लोक सनस्क्रीन, टोपी किंवा हलके कपडे खरेदी करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून हानी पोहोचते.
भीषण परिस्थिती असूनही, बेघर लोकांना दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM-SUH) आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सारख्या सरकारी कल्याणकारी कार्यक्रमांचा लाभ मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे ना ओळखपत्र आहे ना कायमचा पत्ता. सुनील कुमार अलेदिया म्हणाले की, अशा लोकांना फूटपाथवर दिवस काढण्याशिवाय पर्याय नाही. या गंभीर परिस्थितीत शीतकरण केंद्रे उभारणे, निवारागृहांची व्यवस्था करणे, पाणी आणि घरे उपलब्ध करून देणे यासारख्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावे लागेल.





