Guardian Minister of Nandurbar : राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री (Guardian Minister of Nandurbar) मिळाला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) पुन्हा हे पद परत आले आहे. राज्य शासनाने याबाबत अधिकृत परिपत्रक (Guardian Minister of Nandurbar) जारी करून ही नियुक्ती जाहीर केली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे पद रिक्त पूर्वी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे हे कार्यरत होते. मात्र, शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे डिसेंबर २०२५ पासून नंदुरबारचे पालकमंत्रिपद रिक्त राहिले होते. या कालावधीत जिल्ह्यातील विकास कामे आणि प्रशासकीय बाबींवर परिणाम होत होता. आता ही रिक्तता भरून काढण्यात आली असून, हसन मुश्रीफ यांना ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. Guardian Minister of Nandurbar हसन मुश्रीफ यांच्याकडे आता दोन जिल्ह्यांची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडे आधीच वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. आता त्यांच्याकडे वाशीमसह नंदुरबार जिल्ह्याचीही जबाबदारी मिळाली आहे. हा निर्णय जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हसन मुश्रीफ कोण आहेत? हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचा जन्म २४ मार्च १९५४ रोजी झाला असून, त्यांनी बी.ए. ऑनर्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. सध्या ते कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आणि येथून त्यांनी डबल हॅट्ट्रिक (सलग तीन वेळा) विजय मिळवला आहे. ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी चेअरमन राहिले असून, १९८५ ते २००९ या काळात जिल्हा बँकेचे संचालक होते. ऑक्टोबर १९९९ मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा विपुल राजकीय अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य याचा फायदा आता नंदुरबार जिल्ह्याला होईल, अशी अपेक्षा आहे. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने, मुश्रीफ यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक विकास आणि आदिवासी कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जाऊ शकतील.