‘ताबडतोब राजभवन रिकामे करा’ ; गव्हर्नर हाऊसमध्ये तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना बंगालच्या राज्यपालांचे निर्देश

Governor CV Anand Bose । पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी आज सकाळी राजभवन येथे तैनात असलेल्या कोलकाता पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना, “बोस राजभवनाच्या उत्तरेकडील गेटजवळ असलेल्या पोलिस चौकीचे ‘जनमंच’मध्ये रूपांतर करण्याचा विचार करत आहेत. एका या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी , “राज्यपालांनी प्रभारी अधिकाऱ्यासह राजभवनाच्या आत तैनात असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.” असे म्हटले.
शुभेंदू अधिकारी यांना राजभवनात येण्यापासून रोखले Governor CV Anand Bose ।
हे अशावेळी घडत आहे जेव्हा नुकतेच भाजप नेते सुभेंदू अधिकारी आणि राज्यातील मतदानानंतरच्या हिंसाचारातील पीडितांना बोस यांना भेटण्यासाठी राजभवनात जाण्यापासून पोलिसांनी रोखले होते. राज्यपालांनी यासाठी लेखी परवानगी दिली होती. यानंतर राज्यपालांचा हा आदेश आला आहे.
भाजपने काय आरोप केला? Governor CV Anand Bose ।
लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या कथित हिंसाचारानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आणि बिप्लब कुमार देब यांच्यासह पक्षाचे चार सदस्यीय केंद्रीय पथक रविवारी संध्याकाळी पोहोचले.
लोकसभा निवडणुकीनंतर, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या समर्थकांना पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांविरुद्ध हिंसाचार आणि धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
TMC काय म्हणाली?
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी राज्यसभा सदस्य शंतनू सेन यांनी भाजपवर ताशेरे ओढले आणि म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या जनतेने नाकारल्यानंतर ते आता निमित्त शोधत आहेत. राज्यातील लोकसभेच्या 42 जागांपैकी तृणमूल काँग्रेसने 29, भाजपने 12 आणि काँग्रेसने एक जागा जिंकली.





