Girish Mahajan on Eknath Khadse । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दिग्गज नेत्याची पक्ष बदलाच्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यातच सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे शरद पवार गटाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर खोचक प्रतिक्रिया दिली. याविषयी बोलताना गिरीश महाजन यांनी ‘एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा’ आहेत, असे म्हणत खडसेंवर सडकून टीका केली. तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलीचाही निवडणुकीत पराभव झाला आहे, असेही महाजन म्हणाले. जळगाव जिल्ह्यात खडसे आणि महाजन हे कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत.
‘ग्रामपंचायतही त्यांच्या हातात नाही’ Girish Mahajan on Eknath Khadse ।
खडसेंच्या घोषणेवर गिरीश महाजन म्हणाले, खडसे विझलेल्या दिव्यासारखे आहेत. ग्रामपंचायतही त्यांच्या हातात नाही. ते एका बँकेवर नियंत्रण ठेवत होते, परंतु संचालक मंडळ देखील बदलले आहे आणि नवीन मंडळाचे सदस्य त्यांचे ऐकत नाहीत. त्यांचा निर्णय इतका महत्त्वाचा का? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
वर्षांपूर्वी सोडली होती भाजपची साथ Girish Mahajan on Eknath Khadse ।
दरम्यान, 2020 मध्ये एकनाथ खडसे यांनी 40 वर्षांनंतर भाजपशी संबंध तोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर भाजप सोडल्याचा ठपका ठेवला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी पक्षाविरोधात बंड करून एकनाथ शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला होता. खडसे हे शरद पवार गोटात असले तरी. आता तीन वर्षांनंतर खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात नवी दिल्लीत आपल्या जुन्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यात निवडणूक होणार असून, 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.