Gautam Gambhir Tension : टीम इंडियाच्या क्रिकेट रसिकांसाठी २०२५ हा वर्ष सिनिअर खेळाडूंच्या जबरदस्त पुनरागमनाचा ठरला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी अप्रतिम कामगिरी करून संघात आपली जागा पक्की केली. या यशस्वी कमबॅकनंतर आता तिसरा सिनिअर स्टार खेळाडू मैदानात धमाल मचवण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा खेळाडू जर भारतीय टेस्ट संघात परतला तर मुख्य कोच गौतम गंभीरसमोर (Gautam Gambhir Tension) मोठी पेचरूक निर्माण होणार आहे. कारण गंभीरच्या ‘लाडक्या’ युवा गोलंदाजाला संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. रोहित-विराटनंतर हा तिसरा सिनिअर कोण? तो मैदानावर कसा कमबॅक करणार? आणि गंभीरचे ‘टेन्शन’ का वाढणार? चला, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.. गंभीरचे ‘टेन्शन’ का वाढणार? भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एक वेगळीच क्रांती घडत आहे. नवीन मुख्य कोच गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा फोकस युवा आणि उद्योन्मुख खेळाडूंवर केंद्रित आहे. गंभीर यांचे ध्येय आहे की, अनुभवी खेळाडूंवर अवलंबून न राहता नवीन पिढीला संधी देऊन मजबूत संघ घडवावा. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जबरदस्त फॉर्म दाखवून हे धोरण हादरवले. त्यांच्या कमबॅकमुळे दोन प्रमुख युवा फलंदाज – यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल – यांच्या जागा धोक्यात आल्या. आता तिसरा सिनिअर खेळाडू परत येण्याच्या चर्चेने गंभीर यांच्या डोक्यावर ताण आला आहे. कारण, हा खेळाडू जर निवडला गेला तर गंभीर यांच्या लाडक्या युवा गोलंदाजाला बाजूला सारावे लागेल. गंभीर यांनी हर्षित राणाला (२३ वर्षे) नेहमीच पाठिंबा दिला आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये (KKR) त्यांच्याबरोबर काम केल्याने राणा हा गंभीर यांचा ‘ब्लू-प्रिंट’ आहे. मात्र, रणजी ट्रॉफीतील जबरदस्त कामगिरीमुळे सिनिअर गोलंदाजाची निवड झाली तर राणाचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता आहे. हे गंभीर यांच्या युवा धोरणाला मोठा धक्का देईल आणि सिलेक्टर्सवरही दबाव येईल. मोहम्मद शमीची धमाकेदार कमबॅकची शक्यता! हा सिनिअर खेळाडू म्हणजे कोण? दुसरा-तिसरा कुणी नसून, टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आहे. ३५ वर्षीय शमीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर (मार्च २०२५) संघातून बाहेर बसल्यानंतर आता रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये धडाकेबाज पुनरागमन केले आहे. बंगालकडून खेळताना त्याने पहिल्या दोन सामन्यांत एकूण १५ विकेट्स घेतल्या आहेत – पहिल्या सामन्यात (उत्तराखंडविरुद्ध) ७ विकेट्स आणि दुसऱ्या सामन्यात (गुजरातविरुद्ध) ८ विकेट्स! शमीची ही कामगिरी पाहता, सिलेक्टर्सना त्याला रोखणे कठीण आहे. मुख्य सिलेक्टर अजित आगरकर यांनी शमीच्या फिटनेसमुळे (फिटनेस इश्यू) त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळले होते. मात्र, शमीने प्रत्युत्तर देताना म्हटले, “जर फिटनेस इश्यू असेल, तर मी रणजीत का खेळतोय? मी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल आणि दुलीप ट्रॉफी खेळलो, मी पूर्ण फिट आहे!” आता रणजीतील ह्या कामगिरीमुळे शमीला वगळणे अशक्य झाले आहे. विशेषतः, भारताचा सध्याचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टेस्ट मालिकेसाठी (नोव्हेंबर १४, कोलकाता येथे सुरू होणारी) शमीची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. गंभीरच्या लाडक्या हर्षित राणाचा ‘पत्ता कट’? जर मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मालिकेत परतला तर गौतम गंभीर यांचा लाडका खेळाडू हर्षित राणाचा प्रवास धोक्यात येईल. राणा हा एकमेव ऑलराऊंडर गोलंदाज आहे जो संघात नवीन चेहरा आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे अनुभवी आहेत, तर राणाची वेगळीच स्टाइल (उंची, वेग आणि नंबर ८ वर फलंदाजी) गंभीर यांना आवडते. आयपीएल KKR मधील त्यांच्या जोडीमुळे राणाला प्राधान्य मिळाले आहे. मात्र, शमीच्या कमबॅकमुळे पेस अटॅकमध्ये स्पॉट मर्यादित आहे. इंडिया ‘ए’ संघातही शमीला स्थान मिळाले नाही, पण रणजीतील फॉर्ममुळे तो टेस्ट मालिकेसाठी मजबूत दावेदार आहे. शमीचे कमबॅक क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहवर्धक रोहित-विराटनंतर मोहम्मद शमीचे कमबॅक टीम इंडियाला मजबूत करेल. रणजीतील १५ विकेट्सने त्याने सिलेक्टर्सना (विशेषतः अजित आगरकर) इशारा दिला आहे. मात्र, गंभीर यांच्यासाठी हे आव्हान आहे – युवा धोरण राखायचे की अनुभवाला प्राधान्य द्यायचे? दक्षिण आफ्रिका मालिकेत शमी परतेल का? राणा बाहेर जाईल का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.