“आता वायनाड सोडलंय…लवकरच ते भारत सोडणार” ; राहुल गांधींवर भाजपच्या ‘या’ नेत्याची खोचक टीका

Gaurav Bhatia on Rahul Gandhi। राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झालाय. दरम्यान, या चर्चांमध्ये भाजपकडून हे एक महत्वाचे वक्तव्य समोर आलंय. राहुल गांधी यांनी सध्या वायनाड सोडलंय पण काही दिवसात ते भारत सोडणार असल्याची खोचक टीका भाजपकडून करण्यात आलीय.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी हे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील त्यांचा वायनाड मतदार संघ यावेळी सोडलं असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चेवर भाजपने टीका केलीय. याविषयी गौरव भाटिया यांनी,”एक वेळ अशी येईल की राहुल गांधी देखील भारत सोडतील.” असे म्हटले.
लवकरच ते भारत सोडणार Gaurav Bhatia on Rahul Gandhi।
पुढे बोलताना, “राहुल गांधी वायनाडला गेले होते कारण तिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ते केवळ मुस्लिमांचे नेते असल्याचे यावरून दिसून येते. असे त्यांनी म्हटलं. तसेच “राहुल गांधी यांनी वायनाड सोडले. तो दिवसही येईल जेव्हा आपण भारत सोडून इटलीत जाऊन पिझ्झा खातील,” असे म्हटले.
केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) मधील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) ने केरळमधील चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वायनाड सीटचाही समावेश आहे. सध्या राहुल गांधी या जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत. सीपीआयने वायनाडमधून ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे.
केरळमधील महाआघाडीतील फूट ? Gaurav Bhatia on Rahul Gandhi।
भारतीय आघाडीत सीपीआय आणि काँग्रेसचा समावेश आहे. अशा स्थितीत सीपीआयच्या या दाव्यामुळे केरळमधील महाआघाडीतील फूट म्हणून पाहिले जातय. दरम्यान, मुस्लीम मतदारांची संख्या लक्षात घेऊन आययूएमएललाही आपला उमेदवार उभा करायचा असल्याचे वृत्त आहे. सीपीआयच्या घोषणेनंतर केरळमध्ये डावे आणि काँग्रेसमध्ये जागावाटप होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा अमेठीत पराभव झाला तर वायनाडमधूनच जिंकले. भाजपशी टक्कर देण्यासाठी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष 2024 च्या निवडणुकीत इंडिया आघाडीत निवडणूक लढवत आहेत. आघाडीत सहभागी पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अनेक राज्यांमध्ये एकमत झालेले नाही. दरम्यान, वायनाडच्या जागेबाबत राहुल गांधी याठिकाणावरून निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले जात आहे.





