Fertilizer industry crisis: देशातील युरिया खत निर्माण करणार्या कंपन्यांना नैसर्गिक वायू लागतो. हा वायू कतारमधून येतो. कतारमधील उत्पादन आणि पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे देशातील युरिया तयार करणार्या कंपन्यांनी एकतर उत्पादन बंद केले आहे किंवा वार्षिक देखभालीसाठी कारखाने सध्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही खत कारखान्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, खताचा कारखाना एकदा बंद केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. मात्र आमच्यापुढे सध्या कसलाच पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे एकतर उत्पादन थांबवावे लागत आहे किंवा कमी पातळीवर ठेवावे लागत आहे. शिवाय कारखान्याची देखभाल नंतर केली जाणार असताना ती आता करण्याचा निर्णय काही कारखान्यांनी घेतला आहे. हेही वाचा – युद्धाच्या भडक्याने शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1342 अंकांनी कोसळला सध्या खत कारखान्यांना त्यांच्या गरजेच्या केवळ 70% इतका गॅस उपलब्ध होत आहे. शिवाय परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. सुदैवाची बाब म्हणजे सध्या भारताकडे युरियासह इतर खतांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे खरीप हंगामावेळी भारतीय शेतकर्यांना खतासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही.