औरंगाबाद – शेतकरी आत्महत्या ही नवी समस्या किंवा नवा प्रकार नाही आणि महाराष्ट्रात अशा घटना अनेक वर्षांपासून घडत आहेत असे काहीसे बेफिकीरीचे विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. (Farmers ending their lives is not new issue: Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar) अलीकडेच औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यावर प्रतिक्रिया देताना कृषी मंत्र्यांनी हे विधान केले.
त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून अशा घटना घडत आहेत. माझ्या मतदारसंघासह महाराष्ट्रात कुठेही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत, असं मला वाटतं, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.
सिल्लोडमध्ये अलिकडेच दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तथापि, सूत्रांनी दावा केला आहे की याच कालावधीत मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात किमान सहा शेतक-यांनी कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवले आहे.या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai : देशात सर्वाधिक उष्ण मुंबईच; मार्चमध्ये दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची झाली नोंद
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सिल्लोडमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची रविवारी सत्तार यांनी पाहणी केली.मंत्री म्हणाले की शेतकरी आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नमेण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर आम्हीं त्यावर काम करू.