Ambati Rayudu Joins YSR Congress : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केला आहे. 37 वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्तीनंतर, माजी भारतीय क्रिकेटर रायडू हा गुरुवारी (28 डिसेंबर) अधिकृतपणे पार्टीमध्ये सामील झाला.
युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यानं पक्षात प्रवेश केला. सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना रायडू याने पक्षात प्रवेश केला. आता, अशा स्थितीत पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीत तिकीट देणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वायएसआरसीपीच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर अंबाती तिरुपती रायडू हा मुख्यमंत्री वायएस जगन यांच्या उपस्थितीत सीएम कॅम्प ऑफिसमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षात सामील झाला. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
సీఎం క్యాంప్ కార్యాలయంలో ముఖ్యమంత్రి శ్రీ వైఎస్ జగన్ సమక్షంలో వైఎస్సార్ కాంగ్రెస్ పార్టీలో చేరిన ప్రముఖ భారత క్రికెటర్ అంబటి తిరుపతి రాయుడు.
ఈ కార్యక్రమంలో పాల్గొన్న డిప్యూటీ సీఎం నారాయణ స్వామి, ఎంపీ పెద్దిరెడ్డి మిథున్ రెడ్డి.#CMYSJagan#AndhraPradesh @RayuduAmbati pic.twitter.com/QJJk07geHL
— YSR Congress Party (@YSRCParty) December 28, 2023
प्रवेशापूर्वी गुंटूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिली भेट…
उल्लेखनीय म्हणजे रायडूने 29 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्याने नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील गावानां भेट दिली आणि लोकांच्या भेटी घेतल्या.
जूनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नायडू म्हणाला होता की, ‘लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. याआधी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी विविध भागांना भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तो म्हणाला होता की, “राजकारणात कसे जायचे आणि कोणते व्यासपीठ निवडायचे यावर मी एक ठोस कृती योजना तयार करेन.” दरम्यान, क्रिकेटपटूने त्यावेळी तो 2024 मध्ये गुंटूर किंवा मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या कयास फेटाळून लावल्या होत्या.
रायुडूची क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय कारकीर्द….
अंबाती रायडूने 2013 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आपल्या 55 सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 47 च्या सरासरीने 1 हजार 694 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकेही आहेत. रायुडूने भारतासाठी 6 टी-20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत. त्याने 2019 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. 2018 मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला. या काळात रायुडूने 203 सामन्यात 4 हजार 328 धावा केल्या. त्याने मुंबई इंडियन्ससह तीन आणि चेन्नई सुपर किंग्जसह तीन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.