Emergency News : “खुर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी आणली”; जे. पी. नड्डा यांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला !

Emergency News : भारत ही केवळ सर्वात मोठी लोकशाही नसून ती लोकशाहीची जननी आहे. आता पुढच्या वर्षी आणीबाणी लागू होण्याच्या घटनेला 50 वर्षे होतील. त्यावेळी आम्ही लोकशाही विरोधी दिन साजरा करू. काँग्रेसनेही त्यात सामील व्हावे आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटण्याचा कुटील प्रयत्न झाला.
मी तुम्हाला 25 जून 2025 रोजी होणाऱ्या लोकशाही विरोधी दिनात नक्कीच सहभागी होण्याचे आवाहन करतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केले. मंगळवारी राज्यसभेत राज्यघटनेवर चर्चा झाली. यावेळीआणीबाणीसह अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
नड्डा म्हणाले, आम्ही जे सण साजरे करतो, ते एक प्रकारे संविधानाप्रतीचे आमचे समर्पण, संविधानाप्रती असलेली आमची बांधिलकी दृढ करतात. आम्ही या संधीचा चांगला उपयोग करू आणि राष्ट्रीय ध्येय साध्य करू. आपण जेव्हा संस्कृतीबद्दल बोलतो तेव्हा अनेक वेळा आपण पुरोगामी नाही असे लोकांना वाटते. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवरही अजिंठा आणि एलोरा लेण्यांचा ठसा होता. त्यावर कमळाची छापही आपल्याला दिसते.
कमळ हे प्रतीक आहे की चिखलातून आणि दलदलीतून बाहेर पडल्यानंतर आणि स्वातंत्र्यासाठी लढल्यानंतर, आपण नवीन पहाट आणि नवीन संविधान घेऊन उभे राहण्यास तयार आहोत. त्यामुळे आपली राज्यघटनाही आपल्याला कमळातून प्रेरणा देते की, सर्व अडचणी आल्या तरी लोकशाही बळकट करण्यात आपण कोणतीही कसर सोडणार नाही.
नड्डा पुढे म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांच्याकडे देशाला एकत्र आणण्याचे काम देण्यात आले होते आणि मला खूप आनंद झाला की खूप दिवसांनी मी काँग्रेसकडून सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव ऐकले. त्यांनी 562 संस्थानांचे विलीनीकरण करून जम्मू-काश्मीर तत्कालीन पंतप्रधानांच्या ताब्यात दिले. ते म्हणाले, आणीबाणी का लादली? देशाला धोका होता का? नाही, देशाला धोका नव्हता. खुर्ची धोक्यात आली. ते फक्त खुर्चीपुरतेच होते. त्यामुळे संपूर्ण देश अंधारात बुडाला.





