‘वेबसाइटवर जा आणि डेटा पहा’, काँग्रेसने महाराष्ट्राच्या मतदार यादीवर उपस्थित केलेल्या प्रश्नाना ECIचे उत्तर

Election Commission: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. असे असतानाही राज्यात निवडणुकीबाबत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. राज्यात झालेल्या निवडणुकांबाबत काँग्रेस पक्षाने केलेल्या सर्व आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मंगळवारी (24 डिसेंबर 2024) काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. ECI ने सांगितले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा जागेसाठी पक्षाने मागवलेला डेटा आणि फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, तो डाउनलोड केला जाऊ शकतो.
मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याबाबत प्रश्न –
महाराष्ट्र निवडणुकीच्या मतदार यादीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तरे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, काँग्रेसने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत 80 हजार 391 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. म्हणजे एका विधानसभा मतदारसंघातून सरासरी 2779 मतदार काढून टाकण्यात आले.
संपूर्ण प्रक्रियेचे पालन केले – निवडणूक आयोग
यावर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, जी नावे हटवण्यात आली आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. नोटीस जारी करण्याबरोबरच, अशा प्रकरणांमध्ये मतदाराचा मृत्यू झाला आहे, किंवा त्याचा पत्ता बदलला आहे, किंवा तो आता त्या पत्त्यावर राहत नाही, याची खात्री करण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतरच मतदारांची नावे मतदारातून काढून टाकण्यात आली.
ECI gets down to informing each and every elementary part of voter turnout release during election. Issues a detailed note and FAQs. The Commission while responding to the complaints by INC in recently concluded Maharashtra Assembly Elections 2024, explained in detail the… pic.twitter.com/bcAGJAYMyf
— ANI (@ANI) December 24, 2024
काँग्रेसला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष किंवा उमेदवारांच्या सक्रिय सहभागाची सुमारे 60 उदाहरणे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्ष/उमेदवारांचा अर्थपूर्ण सहभाग हा भारतीय निवडणूक प्रक्रियेचा प्रमुख आधारस्तंभ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तक्रारींबाबत काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाकडे अनेक आकडे मागितल्याचे सांगितले होते.
ECI Asserts Transparency and Rule-Based Process in Electoral Roll Preparation while involving all political parties at every step. On INC’s concerns regarding discrepancies in Electoral Roll preparation, ECI asserts the working of a meticulous, transparent and participative… pic.twitter.com/wkqI5C7SeT
— ANI (@ANI) December 24, 2024
‘संध्याकाळी 5 वाजताचे आकडे आणि अंतिम आकडे यांची तुलना योग्य नाही’ –
काँग्रेसला दिलेल्या प्रत्युत्तरात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, संध्याकाळी 5 वाजताच्या मतदानाच्या आकडेवारीची अंतिम मतदानाच्या आकडेवारीशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. संध्याकाळी 5 ते 11:45 या वेळेत मतदानात वाढ होणे सामान्य आहे, जे मतदारांच्या मतदानाच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे आणि पडलेली मते आणि मतांची मोजणी यात वास्तविक पण क्षुल्लक फरक कसा असू शकतो हे देखील नमूद केले आहे.
‘वास्तविक मतदानात बदल होणे अशक्य’ –
मतदानाचा तपशील देणारा वैधानिक फॉर्म 17C मतदान केंद्रावर मतदान संपल्यावर उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे उपलब्ध असल्याने प्रत्यक्ष मतदारांच्या संख्येत बदल करणे अशक्य आहे यावर निवडणूक आयोगाने भर दिला. आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मतदार यादी तयार करताना नियमावर आधारित प्रक्रिया पारदर्शकतेने पाळली गेली आणि राज्यातील मतदारांची नावे वगळण्यात कोणतीही अनियमितता झाली नाही. आयोगाने काँग्रेसला सांगितले की, काँग्रेस प्रतिनिधींच्या सहभागासह मतदार यादी तयार करताना योग्य प्रक्रिया पाळण्यात आली.
Roll to Poll involvement of political parties: EC lists out nearly 60 instances of proactive involvement of political parties or candidates during the entire electoral process. The Commission reiterated that political parties, being key stakeholders, are involved scrupulously at… pic.twitter.com/E3AArx6vI3
— ANI (@ANI) December 24, 2024





