आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न पाहिले कारण…; विराटची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला ते पाहा..!

IPL 2025 Virat Kohli : आयपील २०२५ च्या अंतिम सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. आरसीबी कि पंजाब यावर पैज्या लागल्या होत्या. अखेर आरसीबीने आयपील २०२५ चा विजेता होण्याचा बहुमान पटकावला. संघातील सर्वच खेळाडूंनी उत्तम खेळी करत पंजाब किंग्सला पराभवाजी धूळ चारली.
आरसीबीच्या विजयानंतर देशात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रस्त्यावर उतरून विजयी जल्लोष साजरा केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 190 धावांचे ध्येय गाठले. मात्र, पंजाब किंग्स संघ १८४ धावांवर येऊन थांबला. केवळ ६ धावांनी आरसीबीने पंजाब किंग्सवर मात करीत जेतेपद आपल्या नावे केले.
२०२५ च्या आयपीएल हंगामात कोहलीने रॅायल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे नेतृत्व केले. त्याने विजेतापद मिळविण्यासाठी संघासाठी महत्वाची भूमिका बजावली. या विजयामुळे कोहली अत्यंत भावूक झाला होता. १७ वर्षांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याने आनंद व्यक्त केला. नरेंद्र मोदी स्टेडिएमवरून हे दृश्य पाहण्यासारखे होते.
विजयानंतर त्याने आपली पत्नी अनुष्काला मिठ्ठी मारली. त्याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विजयी ट्राफी जिंकल्यानंतर विराट कोहलीने पहिली प्रतिक्रिया दिली. मी शेवटच्या दिवसांपर्यंत संघासाठी खेळणार अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
नेमकं काय म्हणाला विराट?
गेल्या 18 वर्षांत मी या संघाला सर्वकाही दिलं आहे. काहीही झालं, तरी मी संघाशी एकनिष्ठ राहिलो. अनेकदा असे क्षण आले, जेव्हा माझ्या मनात वेगळे विचार येत होते पण मी या संघाशी एकनिष्ठ राहिलो. मी नेहमीच आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न पाहिले आहे. कारण बंगळुरू माझ्या मनात आहे. मी शेवटच्या दिवसांपर्यंत या संघासाठी खेळणार आहे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली.
हेही वाचा: इ साला कप नामदे! आरसीबीच्या विजयानंतर विजय माल्यांची पहिली प्रतिक्रिया; याचा अर्थ काय? जाणून घ्या…





