Dr Sanjay Tambat – विकसित भारत २०४७ घडवण्यासाठी शिक्षण मातृभाषेतून दिले जाणे अत्यंत आवश्यक असून त्यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व विचारशक्ती अधिक प्रभावीपणे विकसित होते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखा अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) डॉ. संजय तांबट यांनी केले. श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात विकसित भारत २०४७ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. १२ व १३ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी प्रास्ताविक करून परिषदेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. पहिल्या दिवशी डॉ. बालाजी बी.आर., डॉ. संजय तांबट, प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. शीतल देवळालकर यांनी केले तर आभार डॉ. दीपा नेवसे यांनी मानले. दुपारच्या सत्रात संशोधकांनी संशोधन पेपर सादर केले. प्राचार्य डॉ. संध्या चव्हाण व डॉ. पौर्णिमा कदम यांनी संशोधकांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रा. डॉ. निलू घोष, डॉ. नेहा देव यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात संशोधकांना डॉ. मोहन कांबळे यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रासाठी प्रा. डॉ. अनिता बेलापूरकर तसेच डॉ. मोहन कांबळे उपस्थित होते. परिषदेच्या कार्याचा आढावा समन्वयक डॉ. कविता तोटे यांनी सादर केला. तसेच उत्कृष्ट संशोधन पेपर सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा. प्रा. संध्या घोडके, सहा. प्रा. सोनाली पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना आणि संचालक मंडळाने प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे, समन्वयक डॉ. कविता तोटे आणि आयोजन समितीचे कौतुक केले.