प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 30 – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने विज्ञान लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या कै. गो. रा. परांजपे स्मृति पुरस्कारासाठी चेंबूर-मुंबई येथील विज्ञान लेखिका डॉ. मेघश्री दळवी यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार वर्ष 2021 साठी आहे.
12 सप्टेंबर रोजी पुण्यात, संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत तो हिंदी साहित्यिक रवीबाला यांच्या हस्ते दिला जाणार आहे. विज्ञान पदवीधर असलेल्या डॉ. दळवी यांच्या दैनिक “प्रभात’मधील लेखमालेचे या पुरस्कारात योगदान आहे.
दै. “प्रभात’साठी त्यांनी आजपर्यंत 325 हून अधिक विज्ञानविषयक लेख लिहिले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकर्त्या असलेल्या डॉ. दळवी महाराष्ट्रातल्या विविध दिवाळी अंक आणि नियकालिकांसाठी विज्ञानविषयक लेखन केले आहे. विज्ञान कथा हाही त्यांचा आवडीचा विषय आहे.