जालना : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई आणि मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा, म्हणून जालन्यातील एका शेतकऱ्यानं अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं असून त्याच्या ‘या’ अनोख्या आंदोलनाची राज्यात चर्चा होत आहे. तसेच हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.
आजपर्यंत तुम्ही शेकऱ्याला विविध प्रकारचे आंदोलन करताना पाहिले असेल. मात्र, जालन्यातील एका शेतकऱ्यानं आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात हे आंदोलन करण्यात आलं. सुनील जाधव असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
दरम्यान, जाधव यांच्या आई आणि मावशीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत प्रत्येकी 1 हेक्टर 35 आर जमीन मंजूर झालेली आहे. मात्र, असे असतानाही या जमिनीचा अजूनही ताबा मिळालेला नाही.
या संदर्भात अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना जमीन ताब्यात मिळत नसल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यानं अखेर स्वतःला जमिनीत गाडून घेतले आणि या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
India : देशातील Unemployment Rate वाढला, डिसेंबर महिन्यातील बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर
त्यांच्या ‘या’ आंदोलनाचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या अनोख्या आंदोलनाची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चा होत आहे. त्यामुळे त्यांच्या या आंदोलनांची प्रशासन गांभीर्याने दखल घेणार का आणि त्यांची मागणी किती लवकर पूर्ण करणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.