Dimbhe Dam: डिंभे धरण ९० टक्क्यांहून अधिक भरले! कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये ६७.५७ टक्के पाणीसाठा
Dimbhe Dam: मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील भातरोपांचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी.

Dimbhe Dam – आंबेगाव तालुक्याला वरदान असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरण ९०.२९टक्के भरले आहे. तसेच एकूण कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून कुकडी प्रकल्पात ६७.५७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान असलेले डिंभे धरण खऱ्या अर्थाने १९८७ साली महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नातून घोडनदी पात्रात डिंभे धरणाची निर्मिती करण्यात आली. धरणाचे २००१ साली डिंभे धरणाची पूर्णतः निर्मिती झाली. यामध्ये ११ पूर्णतः बाधित तसेच १३ अंशतः बाधित, अशी एकूण २४ गावे बाधित झाली. धरणाची एकूण पाणी क्षमता १३.५० टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा १२.५० टीएमसी इतका आहे.
धरणाचे एकूण पानलोट क्षेत्र हे २९८ चौरस किलोमीटर आहे. आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा हा सह्याद्री पर्वतरांगांनी आच्छादला असून पाटण, बोरघर, आहुपे या तिन्ही खोऱ्यातून येणारे पावसाचे पाणी डिंभे पाणलोट क्षेत्रात जमा होते. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. संततदार चाललेल्या पावसामुळे नदी नाले खळखळून वाहत असून भात खाचरे तुडुंब भरून वाहत आहे.
यावर्षी आदिवासी भागात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने आदिवासी पट्ट्यातील भात शेती धोक्यात आली होती. कारण संततदार पावसामुळे दहाड पेरणी करणे आदिवासी बांधवांना जिकरीचे गेले त्यातच अनेक ठिकाणी भातरोपे उगवून पावसामुळे त्यांचे नुकसान झाले तसेच अनेक ठिकाणी उगवण क्षमतेत कमतरता भासल्याने रोपे चांगल्या प्रकारे आली नाही यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी भाताची खाचरे वाहून गेल्याने आदिवासी बांधवाला भात आवणी करताना उत्पादन क्षमतेमध्ये घट झाल्याचे पहावयास मिळते. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आदिवासी भागातील झालेल्या नुकसानीचे मोबदला देऊन पडझड झालेल्या बांधणी कृषी विभागाने बांधून द्याव्यात जेणेकरून आदिवासी बांधवांना काही ना काही मोबदला मिळेल.
धरणांच्या पाण्यात वाढ
संतदादार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून एकूण ६७..५७ टक्के पाणीसाठा झाला असून येडगाव धरण ९०.४२ टक्के, माणिक डोह ४८ टक्के, वडज ८४.२७ टक्के, पिंपळगाव जोगा३३.४७ टक्के, डिंभे धरण ९०.२९ टक्के, विसापूर ९२.२७ टक्के, चिलेवाडी ७९.९५, व घोड धरण ९८.७९ टक्के, असा एकूण ६७.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
चोविस गावे बाधित
डिंभे धरणातील एकूण २४ गावे बाधित झाली असून त्यात ११ पूर्णतः बाधित यामध्ये आंबेगाव, कळंबई, फुलवडे ,कोलतावडे,मेघोली,वचपे, दिगद, पांचाळे बुद्रुक, सावरली, कुशीरे खुर्द, तसेच महाळुंगे तर्फे आंबेगाव, अशी एकूण ११ गावे तर बोरघर, पाटण,कुशिरे खुर्द, पिंपरी, जांभोरी, फलोदे, आंबडे, साकेरी, पोखरी, नानवडे, डिंभे बुद्रुक, पांचाळे खुर्द,





