Abhijit Dipke : धर्मेंद्र प्रधान यांनी दिला शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा! अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया समोर
Abhijit Dipke : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवरुन पोस्ट करत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.

Abhijit Dipke’s first reaction after Dharmendra Pradhan’s resignation : कॅाक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा मागणीसाठी आंदोलन सुरू होते. अशातच एक मोठी घडामोड घडली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवरुन पोस्ट करत आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. ते आता आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Abhijit Dipke)
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यासाठी कॅाक्रोच जनता पार्टीने तीव्र आंदोलन छेडलं होतं. ती मागणी मान्य झाल्याचे प्रधान यांच्या राजीनाम्यावरून दिसत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता जंतर मंतर येथे मोठा जल्लोष केला जात आहे.
#WATCH | Delhi: On the resignation of Union education minister Dharmendra Pradhan, Founding President of Cockroach Janta Party, Abhijeet Dipke says, “There’s no need to be afraid. This is democracy. He has resigned, but we have two more demands. We won’t go like this. Dharmendra… pic.twitter.com/K8xiZ0NInO
— ANI (@ANI) July 25, 2026
अभिजीत दिपके म्हणाले…. (Abhijit Dipke)
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “हे म्हणत होते, या सरकामध्ये राजीनामा होत नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, असे दिपके यांनी म्हटलं आहे. त्यानंतर जंतर मंतरवर एकच जल्लोष केला जात आहे. (Abhijit Dipke)
खरंतर आज पुन्हा एकदा केंद्र सरकारसोबत कॅाक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची चर्चा होणार होती. मात्र त्या आधीची ही मोठी घडामोड घडली आहे. आंदोलकांची सर्वात प्रमुख मागणी अखेर केंद्र सरकारने मान्य केली आहे. हेच या आंदोलनाचे सर्वात मोठं यश मानले जात आहे. (Abhijit Dipke)
…म्हणून राजीनामा घ्यावा लागला (Abhijit Dipke)
विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा दिला होता. या आंदोलनाची झळ देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पसरली होती. आंदोलनाची व्याप्ती वाढत चाललली होती. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात असंतोष वाढतच चालला होता. त्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला असल्याचे समजते.





