राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भाजपकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी मुंबईमध्ये विराट मोर्चा पुराकला आहे. या मोर्चावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवा, अशी मागणी या मोर्चातून केली जात आहे.
“जनाची नाही तर मनाची लाज वाटायला…”, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल
त्याचबरोबर मागील काही दिवसांत महाराष्ट्रातून बाहेर गेलेले प्रकल्प, राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मंत्री चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरु असलेला सीमा वाद, अशा अनेक मुद्द्यांना धरून महाविकास आघाडी व इतर पक्ष आणि संघटनांनी हा मोर्चा पुकारला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चावर खोचक टीका केली आहे.
“जनाची नाही तर मनाची लाज वाटायला…”, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल
देवेंद्र फडणविस यांनी म्हटले की,“मोर्चा तर लहानच झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून माणसं बोलवल्यानंतर परिस्थिती अशी हवी होती की कैक किलोमीटर लांब मोर्चा झाला. पूर्ण आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता. पण मोर्चा अपयशी ठरला हे संख्येवरून दिसतंय”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
यावेळी मोर्चामध्ये लोकांना संबोधित करताना महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपापली भाषणे केली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की,”या राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे. एका मंत्र्याने उल्लेख केला की शिक्षणासाठी मदत मागितली तर त्याला भीक मागितली असं म्हणाले. तिथे महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला”