दिल्लीत केजरीवालांच्या जय-पराजयाचा भाजपवर होणार परिणाम ; ‘या’ ५ मुद्द्यातून समजून घ्या राजकीय समीकरण

Delhi Assembly Election 2025 । दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे. तर ८ फेब्रुवारीला दिल्लीवर कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होईल मतमोजणीच्या माध्यमातून स्पष्ट होईल. हे असे असताना आता विरोधी पक्षाची आघाडी असणारी इंडिया अलायन्समध्ये निर्माण झालेल्या फुटीमुळे, नवीन समीकरणे आणि नवीन शक्यता उदयास येत आहेत.
आम आदमी पक्ष आणि भाजपही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु संपूर्ण लढाईत फक्त काँग्रेसच एकटी उभी असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने दिल्लीत त्रिकोणी लढत देण्याचा प्रयत्न केला असला तरी ही लढाई केवळ आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप यांच्या पुरतीच मर्यादित राहिली आहे असे चित्र स्पष्ट झाले आहे.
अरविंद केजरीवाल यांना अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर, काँग्रेस कमकुवत होईल आणि स्पर्धेत मागे पडू शकते हे स्पष्ट आहे.दिल्लीतील मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्यामुळे काँग्रेसचा दावा आधीच कमकुवत वाटत होता, परंतु सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक गंभीर असल्याचे दिसत आहे. २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचा वाटा ९.६५ टक्के होता आणि २०२० पर्यंत तो ४.२६ टक्के झाला. लोकसभा निवडणुकीत १८.९१% मतदान निश्चितच झाले आहे, पण विधानसभा निवडणुकीत असा चमत्कार दिसेल असे वाटत नाही.
दिल्ली निवडणुकीबाबत काँग्रेस नेते आधीच सक्रिय आणि आक्रमक असल्याचे दिसून येत आहे, परंतु इंडिया ब्लॉकमधील फुटीचा काँग्रेसवर परिणाम होत असल्याचे दुसरीकडे पाहायला मिळत आहे. जे काही घडत आहे ते पाहिले तर भाजपची स्थिती मजबूत होत आहे – परंतु असे नाही की दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करून त्यांना फक्त फायदाच होईल, तर भाजपला अनेक तोटेही होऊ शकतात.
१. केजरीवाल जिंकले तर काँग्रेसच्या अडचणीत वाढ Delhi Assembly Election 2025 ।
आम आदमी पक्षाचे केंद्र दिल्ली आहे. पक्षाचा प्रभाव गोवा आणि गुजरातमध्येही आहे, परंतु पक्षाची ताकद पंजाबमध्ये सर्वात जास्त दिसून येतो, ज्याठिकाणी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आहे.
आता जर अरविंद केजरीवाल दिल्लीत पुन्हा सत्तेत आले तर इंडिया ब्लॉकमध्ये नेतृत्वाचा आणखी एक दावेदार उदयास येईल. पंरतु , यासाठी अरविंद केजरीवाल यांनी हे काम आधीच सुरू केले आहे, पण त्यांनी हे उघडपणे बाहेर आणले नाही. भाजप नेते अमित शहा यांनी आंबेडकरांच्या नावावर केलेल्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू नेते नितीश कुमार यांना लिहिलेले पत्र हा फक्त ट्रेलर होता निवडणूक जिंकल्यानंतर एक वेगळा दृष्टिकोन दिसून येईल असेही म्हटले जात आहे.
२. काँग्रेसचे संकट भाजपसाठी फायदेशीर
आम आदमी पक्षाचा जन्म काँग्रेसच्या अडचणीतून झाला आहे, जर अडचणी वाढल्या तर स्वाभाविकपणे भाजपला फायदा होईल. काँग्रेस आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने पुन्हा एकदा आपल्या पायावर उभी राहू लागली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसने जिंकलेल्या लोकसभा जागा हे याचे सर्वात मोठे पुरावे आहेत. जर अरविंद केजरीवाल यांच्या विजयामुळे काँग्रेस नवीन अडचणीत सापडली तर त्याचा फायदा भाजपला होईल.
३. केजरीवाल यांचा विजय भाजपसाठी अडचणींचा
दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या विजयामुळे काँग्रेसला अडचणी येतील आणि भाजपला चांगली साथ मिळेल असे नाही – आम आदमी पक्षाच्या विजयामुळे भाजपला राष्ट्रीय पातळीवर एक नवीन आव्हान मिळेल हे नक्की.
अरविंद केजरीवाल हे भाजपसाठी काँग्रेसपेक्षा कमकुवत शत्रू आहेत, परंतु ते भाजपसाठी तेवढेच धोकादायकही आहेत. अरविंद केजरीवाल यांनीही भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यामध्ये घुसखोरी केली आहे. त्याची अडचणीही भाजपाला होणार आहे.
दिल्लीतील वृद्धांसाठी अयोध्या दर्शन कार्यक्रम आधीच सुरू होता आणि पुजारी-ग्रंथी योजनेची उदाहरणेही समोर येऊ लागली आहेत. आम आदमी पक्षाच्या सनातन सेवा समितीमध्ये भाजप मंदिर सेलच्या जवळपास १०० सदस्यांचा समावेश हेच दर्शवितो.
४. जर केजरीवाल हरले तर दिल्लीत भाजपची सत्ता येईल Delhi Assembly Election 2025 ।
जर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हरला तर दुसरा भाजपचा मुख्यमंत्री निवडून येईल आणि दुसऱ्या राज्यात भाजपचे सरकार स्थापन होईल.
जर असे झाले तर आम आदमी पक्षाकडून भाजपसमोरील आव्हाने काही प्रमाणात कमी होतील – आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून ते पूर्णपणे सावरेल. जर हरियाणा आणि महाराष्ट्रानंतर दिल्लीत विजयाची हॅटट्रिक झाली तर देशाच्या राजकारणावर पूर्वीसारखाच प्रभाव निर्माण होईल.
५. केजरीवाल यांच्या विजयामुळे विरोधी पक्ष कमकुवत अन् भाजप मजबूत
सध्या विरोधी पक्षात फक्त ममता बॅनर्जी राहुल गांधींना आव्हान देत आहेत, दिल्ली निवडणूक जिंकल्यानंतर अरविंद केजरीवाल देखील आपला दावा मांडतील. जरी आज अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देत असले तरी उद्या संघर्ष होणार हे नक्क्की असल्याचे म्हटले जात आहे.
अरविंद केजरीवाल यांचा राजकीय विस्तार दिल्लीच्या पलीकडेही पसरलेला आहे. पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे सरकार आहे. अखिलेश यादव सध्या सत्तेबाहेर आहेत आणि ममता बॅनर्जी यांचा विस्तार बंगालच्या पलीकडे मर्यादित आहे. जर अरविंद केजरीवाल जिंकले तर विरोधी गटातील संघर्ष वाढेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप याचा पुरेपूर फायदा घेईल.





