मुंबई – मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. समाधीच्या सजावटीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. गुन्हेगाराची समाधी का सजवली, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या माणसाच्या कबरीला इतका आदर का दिला जातो? असा प्रश्नही भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ही कबर कोणत्याही पीरबाबाची नसून मुंबईतील 93 बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनची आहे, असे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले. गुन्हेगाराच्या कबरीला पांढऱ्या संगमरवरी मझार बनवण्यात आले आहे. 93 बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराच्या कबरीची अशी सजावट का? 12 मार्च 1993 रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला तर 700 लोक जखमी झाले.
राम कदम यांनी ट्विट करत या मुद्यावरून उद्धव ठाकरेंसह शरद पवार, राहुल गांधींनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्या काळात पाकिस्तानच्या इशाऱ्यावर मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या याकुब मेमनच्या समाधीचे रूपांतर झाले. हेच त्यांचं मुंबईवरचं प्रेम, हीच त्यांची देशभक्ती? उद्धव ठाकरेंसह शरद पवार, राहुल गांधींनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे तसेच या कुकर्माकडे दुर्लक्ष करायचे नाही,आता पेंग्विन सैन्याने याचे उत्तर द्यावे.’ असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
उधव ठाकरे मुख्यमंत्री थे .उस क़ाल में मुंबई में पाकिस्तान के इशारे पर 1993 में बंबकांड करने वाला ख़ूँख़ार आतनवादी याकूब मेमन की कबर मझार में तब्दील हो गयी .
यही है इनका मुंबई से प्यार , यही इनकी देश भक्ती ?उधव ठाकरे समेत शरद पवार तथा राहुल गांधी माफ़ी माँगे मुंबई की जनता की pic.twitter.com/TAQNhBb36G
— Ram Kadam (@ramkadam) September 7, 2022
कोण आहे याकुब मेमन?
याकूब मेमन हा मुंबईतील ९३ बॉम्बस्फोटांचा दोषी आहे. ज्याला 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील बडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याकूब हा एकमेव दोषी होता ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्याच याकुबच्या कबरीचे समाधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमरवरी दगडापासून बनवलेल्या या कबरीवर एलईडी दिवे लावण्यात आले होते.
साधारणपणे 18 महिन्यांनंतर कबर खोदली जाते, परंतु याकुबची कबर 5 वर्षानंतरही खोदण्यात आली नाही. याकुबच्या कबरीबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. याकुबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन याने एलटी मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. याकुब मेमनचे कब्रस्तान विश्वस्तांनी पाच लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे कबरीवर मेमनच्या कुटुंबाचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, जर तो नसेल तर मग कबरला व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट का दिली जात आहे.