कांगडा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे झालेल्या प्रचारसभेत कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळे यांची हमी आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणजे अस्थिरतेची हमी आहे. कॉंग्रेस पक्ष म्हणजे विकासकामांमध्ये अडथळ्यांची हमी आहे अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
पंतप्रधान म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने आपल्या राजकारणात विकासाला सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे. आज सुशासन, गरिबांचे कल्याण करणारी धोरणे यामुळे भाजपची ओळख आहे. तर दुसरीकडे अनेक कुटुंबे परिवार वाद आणि मतपेढीच्या राजकारणच्या भरवश्यावर काम करत आहेत.
कांग्रेस यानि – अस्थिरता, घोटाले, विकास कार्यों में रोड़े अटकाने की गारंटी।
हिमाचल को कांग्रेस कभी स्थिर सरकार नहीं दे सकती है और न ही वो चाहते हैं।
– पीएम @narendramodi pic.twitter.com/YkW8uSaroI
— BJP (@BJP4India) November 9, 2022
आम्ही केवळ त्याचीच आश्वासने देतो जे आम्ही करू शकतो. 21 व्या शतकात आज हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी आहे की जेथे त्या राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. एका मजबूत सरकारची गरज आहे. असे स्थिर आणि मजबूत सरकार मिळाले आणि त्याला डबल इंजिनची ताकद मिळाली तर हिमाचल प्रदेश सगळे अडथळे ओलांडून एका नव्या उंचीवर जाउन पोहोचेल व वेगाने आपला विकास साध्य करेल.
#DYChandrachud : बोलून नाही, तर काम करून दाखवू; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती
यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या विकासाचा संकल्प सोडणारा जाहीरनामा प्रकाशित केल्याबद्दल भाजपमधील नेत्यांचे अभिनंदन केले. कांगडा हे भारताची श्रद्धा आणि अध्यात्माचे तीर्थ असून ही शक्तिपीठांची धरती आहे. वैद्यनाथ येथून काठगडपर्यंत हिमाचलच्या भूमीवर भगवान शंकराची कायम कृपा राहिली आहे असे त्यांनी नमूद केले.