Raj Thackeray : “कॉलेजची फी 20 हजार रुपये तर क्लासची फी लाख रुपये”; राज ठाकरेंनी थेट मुद्यालाच हात घातला, थेट भाष्य…
Raj Thackeray : मग कॉलेज काय करतंय ? असा सवाल उपस्थित केला.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिक शहर, खड्डे, कुंभमेळ्याची तयारी यापासून ते सध्या देशभरात गाजत असलेलं आंदोलन, विद्यार्थी अशा विविध बाबींवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज ठाकरे म्हणाले “मला ही गोष्टच समजली नाही की, १० वी पास झाल्यावर पहिल्यांदा क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा आणि क्लास सांगणार कोणत्या कॉलेजात जायचं. मुलं आठ आठ तास क्लासमध्ये बसत आहे. मग कॉलेज काय करतंय ? असा सवाल उपस्थित केला.
पुढं बोलताना राज ठाकरे म्हणाले “मला अनेक विद्यार्थी काल येऊन भेटले. नाशिकचा पॅटर्न राज्यभर सुरू आहे. दगडावरचे ठसे घेऊन त्यांचं आधारकार्ड चेक करण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे.” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
CJP च्या जंतरमंतरवरील आंदोलनातील दगड गोळा करून त्यावरील फिंगरप्रिंट आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याच विधानाचा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा समाचार घेतला.
नीलेकणींनी पहिल्यांदा क्लासवर लक्ष दिलं पाहिजे.
आज राज्यासह देशभरात कोचिंग क्लासेसचं पेवं फुटलं आहे. नीट पेपरफुटीचा प्रकार खाजगी कोचिंग क्लासमधून समोर आला होता. त्यामुळे या महत्वाच्या गोष्टींवर राज ठाकरे यांनी भाष्य करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे. “सर्वच कोचिंग क्लास वाईट आहेत असं नाही. पण आता धंदा म्हणून जे आले, नीट पेपरही कोंचिंग क्लासवाल्यांनीच फोडले. आतापर्यंतचे पेपर कोचिंग क्लासवाल्यांनीच फोडले ना. नीलेकणींनी पहिल्यांदा क्लासवर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
…ही अशी भिक्कार शिक्षण पद्धती आहे.
पुढं ते म्हणाले, “क्लास ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलसेजला जायचं? चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे. कॉलेजची फी २० हजार रुपये तर क्लासची फी लाख रुपये. क्लासमध्ये अटेंडन्स लावल्यावर कॉलेजला अटेन्डन्स.कसा लागतो. ही अशी भिक्कार शिक्षण पद्धती आहे. कॉलेजवाल्याला पैसे मिळाले असणार, अशा आक्रमक शैलीत राज ठाकरेंनी सगळचं काढलं.






