Chitra Wagh : “एका चिमुरड्या जीवाचा सौदा करायला तुम्हाला लाज नाही वाटली”; चेंबूर झाड दुर्घटनेच्या चौकशी अहवालावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
Chitra Wagh : चौकशी अहवालावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

Chitra Wagh : मुंबईतील चेंबूर परिसरात शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आता राजकारण तापले आहे. या दुर्घटनेनंतर सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Chitra Wagh)
त्यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट लिहित संबंधित कंत्राटदाराला वाचवण्यासाठी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पडदा टाकण्यासाठी निसर्गाला जबाबदार धरले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ यांची पोस्ट (Chitra Wagh)
“जनतेचा जीव इतका स्वस्त झालाय का..? चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि साफ अमान्य आहे..! स्वतःच्या चुका लपवायला निसर्गाचे नाव पुढे करायचे आणि कंत्राटदाराला पाठीशी घालायचे..? लाज वाटावी असा हा अहवाल आहे..! एका चिमुरड्या जीवाचा सौदा करायला तुम्हाला लाज नाही वाटली..? बाळाची किंमत 7 लाख लावणार्या अधिकार्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तात्काळ कार्यवाही व्हावी.” अशी मोठी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
जनतेचा जीव इतका स्वस्त झालाय का..?
चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेचा चौकशी अहवाल अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि साफ अमान्य आहे..!
स्वतःच्या चुका लपवायला निसर्गाचे नाव पुढे करायचे आणि कंत्राटदाराला पाठीशी घालायचे..?
लाज वाटावी असा हा अहवाल आहे..! एका चिमुरड्या जीवाचा सौदा…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 14, 2026
नेमकं काय घडलं होतं? (Chitra Wagh)
मुंबईतील चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ३० जून २०२६ रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे मोठे झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी समितीची नियुक्ती केली होती. समितीने आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केला आहे.
दुर्घटनेमागे नैसर्गिक कारणेही असल्याचा निष्कर्ष (Chitra Wagh)
चौकशी अहवालानुसार, या प्रकरणात उद्यान विभाग आणि रस्ते विभागाला जबाबदार धरलेले नसून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र, पर्जन्य जलवाहिनीच्या कामातील त्रुटींमुळे संबंधित कंत्राटदारावर ५ लाख रुपयांचा, तर सल्लागार संस्थेवर २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाड कोसळल्याचे नमूद करत दुर्घटनेमागे नैसर्गिक कारणेही असल्याचा निष्कर्ष अहवालात मांडण्यात आला आहे. या अहवालावरून चित्रा वाघ यांनी संंताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : Tumbbad 2 : ‘तुंबाड 2’ चित्रपटात बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी





