Chhagan Bhujbal on Sanjay Raut । “वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीच्या येथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांची शिंगं गाडून ठेवलेली आहेत”, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्षा बंगल्यावर शिंगं पुरली असतील तर ती बाहेर काढा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यपालपदाची चर्चा, राहूल सोलापूरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य यांच्यासह अनेक विषयावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी,”मला राज्यपालपद ऑफर करण्यात आलेलं नाही. मी सर्वसामान्यांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा माणूस आहे.मला त्यांच्यावर संकट येतं, अडचणी येतात त्यावेळी पुढं राहून लढावं लागतं. जर मी अशी पदं घेतली, राज्यपाल पद मोठंच आहे, पण तशी पद घेतली तर मी कुणासाठी भांडू शकणार नाही. त्यापेक्षा मागासवर्गीयांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे, असे त्यांनी म्हटलं. या लोकांना वेड लागलंय का ? वाटेल ती विधानं सुरु Chhagan Bhujbal on Sanjay Raut । दरम्यान, राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेबाबतच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. या लोकांना वेड लागलंय का काय लागलंय,हे कोण आहेत. ?औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात, औरंगजेबाकडे सगळ्या देशाचं राज्य होतं त्याला कोण लाच देऊ शकतं, वाटेल ती विधान सुरु आहे.” असे त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी,”छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रा येथील तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळं काम करुन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा तो भाग आहे तिथून ते आग्रा येथून सुटले. तुम्ही म्हणता तसं असतं तर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आरामात आले असते. महाराजांनी संभाजी महाराजांना काशीला सोडून दिलं. एकटे महाराज रायगडावर आले त्यावेळी राजमाता जिजाऊ विचारतात शंभूराजे कुठं आहेत? यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं, हा इतिहास आहे. इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण?” असा सवाल देखील भुजबळ यांनी यावेळी केला आहे. शिंगं गाडली असतील तर ती बाहेर काढा Chhagan Bhujbal on Sanjay Raut । तर दुसरीकडे संजय राऊत यांनी वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीच्या येथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांची शिंगं गाडून ठेवल्याची चर्चा असल्याचे म्हटले. यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांना हसू आवरलं नाही. आणि ते म्हणाले,” ठीक आहे मी काय सांगू शकत नाही, कुठं गाडलेत, ती काढा म्हणावं बाहेर, कुणी तरी बाहेर बोललं असेल. मला काही माहिती नाही. मी त्याबाबत अधिक बोलणार नाही, ” असे त्यांनी यावेळी म्हटले.