Political Map Of India: देशाचा राजकीय नकाशा किती बदलला? कोणत्या राज्यात कोण प्रबळ? जाणून घ्या…

Changes In Political Map Of India – वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांचे निकालही आले आहेत. आता या दोन राज्यांमध्ये भाजपची युती किंवा फक्त भाजपचेच सरकार असेल. यापूर्वी बिगर-भाजप आणि बिगर-काँग्रेस सरकार होते. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस आणि ओडिशात बिजू जनता दलाची सत्ता होती.
सध्या ११ राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत. त्याच वेळी, भाजप सात राज्यांच्या सरकारमध्ये भागधारक आहे. चार राज्यांत काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. तर काँग्रेस चार राज्यांतील आघाडी सरकारचा भाग आहे. सात राज्यांमध्ये इतर पक्षांची सरकारे आहेत. पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे सरकार आहे आणि केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आहे.
🚨Watch how the political map of India changed between 2009-2024🇮🇳
👇🏽— Bharat Tech & Infra (@bharatTechINDIA) June 5, 2024
२०१४ मध्ये सात राज्यात भाजप –
मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रथमच पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा देशातील सात राज्यात भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सरकार चालवत होते. यापैकी पाच राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री होते, तर त्यांचा मित्र पक्ष आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये सत्तेत होता. उर्वरित पाच राज्यांमध्ये, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते. म्हणजेच मोदी पंतप्रधान झाले तेव्हा २६ टक्के लोकसंख्येवर भाजप व मित्रपक्षांचे सरकार होते. त्यावेळी देशातील १४ राज्यांमध्ये काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता होती.
आता पुढे काय होणार? –
सध्या १७ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. लोकसभा निवडणुका, अरुणाचल आणि ओडिशामध्ये विधानसभा निवडणुकांनंतर आता तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यामध्ये हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडचा समावेश आहे. सध्या हरियाणा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, महाराष्ट्र, ओडिशा येथे भाजपचे सरकार आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी, भाजप आणि जनसेना यांची युती सत्तेत आहे.
२०१८ मध्ये भाजपने उच्चांक गाठला –
चार वर्षांनंतर, मार्च 2018 मध्ये, २१ राज्यांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेत होते. देशातील सुमारे ७१ टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. हा तो काळ होता जेव्हा लोकसंख्येच्या बाबतीत भाजपची सत्ता शिखरावर होती. त्याचवेळी चार राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. या राज्यांमध्ये सात टक्के लोकसंख्या राहते.
कोणत्या राज्यात कोण प्रबळ?
भाजपाचे सरकार – अरुणाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपूर, मेघालय, उत्तर प्रदेश, उत्तराखंड
भाजपा मित्रपक्ष- आसाम (एजीपी, यूपीपीएल, बीपीएफ), गोवा (एमजीपी) , हरियाणा (जेजेपी, एचएलपी), महाराष्ट्र भाजपा, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) , नागालँड (एनडीपीपी, एनपीएफ) पुद्दुचेरी (एआयएन आरसी) त्रिपुरा (आयपीएफटी), बिहार (जेडीयू)
काँग्रेसचे सरकार – हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा
काॅंग्रेसचे मित्रपक्ष- झारखंड (जेएमएम), तामिळनाडू (द्रमुक)
-११ राज्यांमध्ये भाजपाचे सरकार
-७ राज्यांमध्ये भाजपा व मित्रपक्षांचे सरकार
-७ राज्यांमध्ये बिगर-भाजपा, बिगर-काॅंग्रेस सरकारे
-४ राज्यांत काॅंग्रेसचे सरकार
-४ राज्यांत काॅंग्रेस व मित्रपक्षांचे सरकार
-२ राज्यांमध्ये आम आदमी सरकार





