‘सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचे आहे..’ रामदास कदम यांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणतात,”त्यांनी केलेलं विधान..”

bawankule on ramdas kadam : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. जागा वाटपावरील चर्चांना अंतिम स्वरुप देण्यात येत असले तर महाविकास आघाडीसह महायुतीतील घटक पक्ष काही जागांवर ठाम असल्याचे चित्र आहे.यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
बावनकुळे म्हणाले की, रामदास कदम जे बोलले आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील.रामदास कदम यांनी केलेले विधान हे काही महायुतीचे मत नाही. त्यांचे मत हे वैयक्तिक स्वरुपाचे आहे. | chandrashekhar bawankule on ramdas kadam
भाजपा सहकारी पक्षांना चांगल्या पद्धतीने सांभाळतो. आमच्याकडे घटकपक्षांना खूप मान आहे. काँग्रेस पक्षाने घटकपक्षांना संपवले. आम्ही मात्र घटकपक्षांना प्रचंड ताकद दिली, मान सन्मान दिला, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. | chandrashekhar bawankule on ramdas kadam
कदमांचे वक्तव्य काय ?
रामदास कदम यांनी रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. काहीही झाले तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे कदम म्हणाले होते. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली होती. सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचे आहे. परंतु,असे होणार नाही. आपण दोघे भाऊ-भाऊ, तुझे आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू… असे चालणार नाही. महायुतीत असे होता कामा नये. कुठल्याही परिस्थिती रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. ती जागा आम्ही लढवणारच. ती आमच्या हक्काची जागा आहे, असे रामदास कदम म्हणाले होते.





