मुंबई – महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 2022 मध्ये 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली. याच काळात विविध घटनांमध्ये 14 वाघांचा मृत्यू झाल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
कॉंग्रेस आमदार बंटी भांगडिया यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. वाघांच्या हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू झाला, तर बिबट्याच्या हल्ल्यात इतर नऊ जण ठार झाले,” ते म्हणाले, पीडितांच्या नातेवाईकांना 20 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
जे 14 वाघ दगावले त्यातील नऊ वाघ आणि तीन बिबट्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे, तर दोन वाघांचा इतर वाघांशी झालेल्या झटापटीत मृत्यू झाला आहे. दोन वाघांचा अपघाती मृत्यू झाला आहे, एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
शेतीला 24 तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री विजयकुमार गावित
कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये किमान पाच चितळ आणि तीन रानडुकरांना शिकारींनी ठार मारले असल्याचेही त्यांनी सांगितले.