मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका
मुंबई: देशात एकीकडे नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाला आहे तर दुसरीकडे याचा विरोध करण्यासाठी काही राज्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत तर काही ठिकाणी नागरिकांनी याचा तीव्र विरोध केला आहे. दरम्यान, याच कायद्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘नागरीकत्व सिद्ध करणे हा केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल आहे. याच कारणांमुळे हा कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही. अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
दै. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत प्रसरित होतेय 3,4 आणि 5 फेब्रुवारीला. ही संपूर्ण मुलाखत https://t.co/fmd1gD2biy वर पहायला मिळेल pic.twitter.com/oOaTLbOKyM
— Saamana (@Saamanaonline) February 2, 2020
‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचा प्रोमो हा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केले आहे. तर सीएएमुळे नागरिकत्वला धक्का नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे राज्यात काय पडसाद उमटणार हे पाहणे गरजेचे आहे.