“पाकने आपली विमाने पाडणे अभिमानास्पद आहे का?” ; ब्रिजभूषण सिंह यांचा राहुल गांधींना खोचक सवाल

Brij Bhushan Singh Slams Rahul Gandhi । ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीवरून देशातील राजकारण शिगेला पोहोचले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत परराष्ट्र मंत्री एस. यांच्यावर हल्लाबोल केला. जयशंकर यांच्यावर आरोप करताना त्यांनी,”पाकिस्तानवर कारवाई करण्यापूर्वी शत्रू देशाला भारत हल्ला करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या मुद्द्यावर भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधींना,” जर परराष्ट्र धोरण अपयशी ठरले तर ते त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का?” असा खोचक सवाल केला आहे.
उत्तर प्रदेशातील गोंडा या ठिकाणी त्यांनी, “मला हे वारंवार सांगावे लागते की मला राहुल गांधींच्या बौद्धिक क्षमतेची दया येते. जर परराष्ट्र धोरण अपयशी ठरले तर ते राहुल गांधींसाठी अभिमानाची गोष्ट आहे का? जर पाकिस्तानने आपली सर्व विमाने उडवली तर ते राहुल गांधींसाठी अभिमानाची गोष्ट आहे का? त्यांना वाटते का की त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न देशात आनंद पसरवतील? सर्वजण राहुल गांधींच्या मागे लागतील. त्यांना समजत नाही की कोणते प्रश्न कधी आणि कधी उपस्थित करावेत.”असे म्हणत त्यांनी टीका केली.
गोंडा, उत्तर प्रदेश: भाजपा नेता बृजभूषण शरण सिंह ने लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी पर कहा, “मुझे बार-बार यह कहना पड़ रहा है कि मुझे राहुल गांधी की बौद्धिक क्षमता पर तरस आता है। अगर विदेश नीति फेल हो गई तो क्या यह राहुल गांधी के लिए गर्व का विषय है? अगर पाकिस्तान ने हमारे… pic.twitter.com/UMGe4sdemr
— IANS Hindi (@IANSKhabar) May 25, 2025
राहुल गांधी काय म्हणाले?
अलिकडेच त्यांनी म्हटले होते की,”भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे कोलमडले आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट केली . त्यात त्यांनी “जेजे स्पष्ट करतील का की भारताला पाकिस्तानसोबत का जोडले जाते? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाने आमच्यासोबत का सहभाग घेतला नाही? ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये “मध्यस्थी” करण्यास कोणी सांगितले? भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले आहे.” असे सवाल केले होते.
पंतप्रधान मोदींनाही प्रश्न विचारले गेले
यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले होते, “मोदीजी, पोकळ बोलणे थांबवा. मला फक्त हे सांगा: तुम्ही पाकिस्तानच्या दहशतवादाबाबतच्या विधानावर विश्वास का ठेवला? ट्रम्पसमोर नतमस्तक होऊन तुम्ही भारताच्या हिताचे बलिदान का दिले? तुमचे रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का उकळते? तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली आहे!”
यापूर्वी १७ मे रोजी गांधी म्हणाले होते की जयशंकर यांचे मौन “निंदनीय” आहे. त्यांनी विचारले होते, “पाकिस्तानला माहित असल्याने आपण किती भारतीय विमाने गमावली? ही चूक नव्हती. हा गुन्हा होता आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.”





