PM Modi BJP Foundation Day| भाजपच्या 44 व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भाजप हा देशातील सर्वात आवडता पक्ष असल्याचे त्यांनी म्हंटले. आगामी लोकसभेच्या दृष्टीने देखील मोदींनी महत्त्वाचे विधान केले आहे. भाजपला लोक केंद्रात आणखी एका टर्मसाठी निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजप स्थापनादिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, “भाजपच्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील कष्टाळू कार्यकर्त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आजचा दिवस भाजपच्या त्या सर्व महान व्यक्तींना आदरांजली वाहण्याचा आहे, ज्यांनी आपल्या कष्टाने, संघर्षाने आणि बलिदानाने पक्षाला या सर्वोच्च स्थानावर आणले. आज मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की भाजप हा सर्वात आवडता पक्ष आहे, जो ‘नेशन फर्स्ट’ हा मंत्र घेऊन जनतेची सेवा करण्यात मग्न आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भाजपने भ्रष्टाचार, घराणेशाही, जातिवाद, सांप्रदायिकता आणि व्होट बँकेच्या राजकारणापासून भारताला मुक्त केले आहे. जे देशावर प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्यांचे वैशिष्ट्य होते. आजच्या भारतात स्वच्छ आणि पारदर्शक कारभारावर भर दिला जात आहे, ज्यामुळे विकासाचे फायदे गरीबांपर्यंत कोणत्याही भेदभावाशिवाय पोहोचतील.”
भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर देशभर के मेरे कर्मठ और परिश्रमी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं। आज @BJP4India की उन सभी महान विभूतियों को नमन करने का दिन है, जिन्होंने वर्षों की अपनी कड़ी मेहनत, संघर्ष और त्याग से पार्टी को सींचकर इस ऊंचाई तक पहुंचाया है। मैं…
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2024
पुढे PM मोदी म्हणाले की, “भाजपने आपला विकासाभिमुख दृष्टिकोन, सुशासन आणि राष्ट्रवादी मूल्यांशी बांधिलकीचा ठसा उमटवला आहे ही आनंदाची बाब आहे. पक्षाच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी चालवलेला, आमचा पक्ष 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. भारतातील तरुण आमच्या पक्षाकडे त्यांच्या आकांक्षा पूर्ण करू शकणारा आणि 21व्या शतकात भारताला नेतृत्व देऊ शकणारा पक्ष म्हणून पाहतात.”
आगामी निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘भारत नवीन लोकसभा निवडण्यासाठी सज्ज आहे. मला विश्वास आहे की लोक आम्हाला आणखी एका कार्यकाळासाठी आशीर्वाद देतील जेणेकरून आम्ही गेल्या दशकात साध्य केलेल्या जमिनीवर उभे राहू शकू. आणीबाणीनंतर, 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसशी लढण्यासाठी पक्षाने इतर विरोधी पक्षांमध्ये विलीन होऊन जनता पक्षाची स्थापना केली. 1984 मध्ये लढलेल्या पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्यांनी लोकसभेच्या फक्त दोन जागा जिंकल्या होत्या.”
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 2014 पासून सलग दोन वर्ष केंद्रात भाजपचे सरकार आहे. यानंतर तिसऱ्या टर्मसाठी देखील त्यांचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: