प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. तालुक्यात 24 तासांत सरासरी 90 मिलिमीतयार पाऊस झाला. खेडच्या पश्चिम भागात भोरगिरी भीमाशंकर परिसरात अतिवृष्टी झाल्याने चास कमान धरणातून भीमा नदीत 30 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भीमानदीला महापुराची स्वरूप आले आहे.खेडच्या पश्चिम भागात भीमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने भीमा नदीला महापुराचे स्वरूप आले होते. भीमाशंकर परिसरात अतिवृष्टी झाल्याने चास कमान धरणातून 30 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सुरुवातील आज (दि. 28)सकाळी सहा वाजण्यसाच्या सुमारास चास कमान धरणातून 15 हजार क्यूसेक, भामा आसखेड धरणातून भामा नदीत 13 हजार 312 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. आंबोली, वांद्रे, भीमाशंकर भोरगिरी परिसरात अतिवृष्टी झाली या दोन्ही धरणात येवा वाढल्याने धरणातून जादा पाणी सोडण्यात आले. चास कमान धरणातून दुपारी दीड वाजता 25 हजार 125 क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले, तर भामा आसखेड धरणातून त्याच वेगाने पाणी सोडण्यात येत होते. चास कमान धारण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने पुन्हा दुपारी साडेतीन वाजता 30 हजार 500 क्यूसेस वेगाने पाणी भिमानदीत सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील भीमा – भामा नद्यांना महापुराची स्वरूप प्राप्त झाले होते.दुपारी चार नंतर पावसाचा वेग कमी होत गेला. सायंकाळी सात वाजता चास कमान धरणातून विसर्ग 30 हजारावरून 20 हजार करण्यात आला. सायंकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी रेड अलर्ट असल्याने पाऊस कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, चास कमान धरण शाखा अभियंता शुभम सिसुंदरे यांनी केले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला.. खेड तालुक्यात काल पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ओढ्या नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे. चास कमान येथे कडूस कडे जाणारा रास्ता पाण्याखाली गेला आहे. चास कमान खरपुडी येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. धामणे येथे ओढ्याला आलेल्या पुरामुळे त्यापुढील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतकर्यांच्या शेताचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील नागडी पिके वाहून गेली आहेत. परतीच्या पावसाचे मोठे संकट शेतकर्यांवर कोसळले आहे तर शाळा कॉलेज, कार्यालयांना सुट्टी असल्याने त्यांची अडचण झाली नाही तालुक्यात सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडलीं नाही.