Rahul Narwekar : तुम्ही दैवी प्रकोप नियंत्रित करू शकता का? राहुल नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल
राज्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि त्याच्याशी संबंधित घटनांच्या संदर्भातील मुद्द्यावरून बुधवारी विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि ठाकरेसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

Rahul Narwekar : राज्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि त्याच्याशी संबंधित घटनांच्या संदर्भातील मुद्द्यावरून बुधवारी विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि ठाकरेसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
पावसाच्या परिस्थितीचा मुद्दा चर्चेला घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निषेध नोंदवला. हा मुद्दा सभागोरासमोरील सर्वात तातडीचा विषय असल्याचे त्यांनी (Rahul Narwekar) म्हटले.
अध्यक्ष नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितले की, सभागृह यावर गुरुवारी अल्पकालीन चर्चा घेईल. तथापि, मान्सूनच्या रौद्र रूपासाठी त्यांनी हवामान बदलाचा उल्लेख केला आणि या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
यावर ठाकरे यांनी विचारले, मँग्रोव्हज (कांदळवन) आणि जंगले तोडण्याबाबत चर्चा होणार का? तुम्ही म्हणाल का की ही दैवी प्रकोपची घटना होती? यावर अध्यक्षांनी विचारले की, आदित्य ठाकरे दैवी प्रकोप नियंत्रित करू शकतात का? त्यानंतर ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांमध्ये कथित अफरातफर झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये घोषणाबाजी आणि प्रति-घोषणाबाजी झाली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.





