Uday Samantha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बडतर्फ करण्यात आलेले कोकणातील मोठे नेते वैभव खेडेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जातं होतं. तशा हालचाली देखील पडद्यामागे सुरू होत्या. मात्र, तारीख पे तारीख असंच काहीसं चित्र खेडेकर यांच्या बाबतीत सुरू असल्याचं दिसत आहे. भाजपमध्ये वैभव खेडकर यांचा पक्षप्रवेश दोनदा रद्द करण्यात आला. यामुळे कोकणच्या राजकारणात वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश चर्चेचा विषय बनला आहे. अशातच आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रवेशाबाबत मोठं विधान केलं आहे. एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश हा तीन-तीन वेळा रद्द होणं हे खच्चीकरण केल्यासारखं असल्याचं सामंत म्हणाले आहेत. तसेच त्यांनी पुढं केलेल्या विधानामुळे वैभव खेडेकर हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. वैभव खेडेकर समाजामध्ये तळागाळात जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व आहे. ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, असं सामंत म्हणाले. पक्षप्रवेश असा तीन वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो अशा पद्धतीने पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे. ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे. त्यांनी कुठच्या पक्षात जावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आहे, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच वैभव खेडेकर तुमच्या शिवसेनेत आले तर पक्षप्रवेश घेणार का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर सामंत यांनी सूचक विधान केलं आहे. पक्षप्रवेश असा तीन वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो, असं सर्वांत मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. खेडेकरांनी घेतली होती रवींद्र चव्हाणांची भेट वैभव खेडेकर यांनी कार्यकर्त्यांसह डोंबीवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. खरंतर ते पक्ष प्रवेशासाठीच गेले होते पण याहेही वेळेस त्यांचा पक्षप्रवेश वेटिंगवर ठेववण्यात आला. यामुळे त्यांच्या पक्षप्रवेश थांबवण्यामागे दोन स्थानिक बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा तळकोकणात सुरू होती. त्यांनी व्हॅाटअॅपला ठेवलेल्या स्टेटस चर्चेचा विषय झालं आहे. ४ सप्टेंबर या दिवशी त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार होता. मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर काही कारणामुळे पक्षप्रवेश झाला नाही. आता पुन्हा एकदा पक्षप्रवेश न झाल्याने विविध राजकीय तर्क वितर्क लावले गेले. यामुळे आता शिवसेना पक्षाचे मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या प्रवेशासाठी दारं खुली केली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा : आग्र्यात मोठी दुर्घटना ; दुर्गा विसर्जनादरम्यान ११ जणांचा नदीत बुडून मृत्यू