बांगलादेशी घुसखोरांबाबत अमित शहांच्या विधानाने बांगलादेश संतप्त ; मोहम्मद युनूस सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Bangladeshi intruders । गृहमंत्री अमित शहा यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार संतप्त झाले आहे. बांगलादेशने भारत सरकारला बांगलादेशातील लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी टाळण्याचा सल्ला दिला आहे. एका निवडणूक रॅलीदरम्यान अमित शाह यांनी बांगलादेशी घुसखोरांना झारखंडमधून बाहेर काढण्याबाबत बोलले होते. ज्याला मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने तीव्र विरोध दर्शवला आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना यासंबंधीचे निषेध पत्र सादर केले आहे. बांगलादेशने पत्राद्वारे म्हटले आहे की, शेजारी देशाच्या जबाबदार लोकांकडून येणारी अशी विधाने दोन्ही मित्र देशांमधील परस्पर समंजसपणा आणि आदराची भावना कमकुवत करतात. खरं तर, शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांनी झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारवर आरोप केले होते. मतपेढीच्या राजकारणासाठी हे लोक बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांना रोखले नाही तर येत्या 25-30 वर्षांत बांगलादेशी घुसखोर बहुसंख्य होतील, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला होता.
घुसखोरीबद्दल गृहमंत्री काय म्हणाले? Bangladeshi intruders ।
बोकारो येथे आयोजित निवडणूक रॅलीदरम्यान गृहमंत्री म्हणाले की, ‘झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरांना जागा नाही. ते आमच्या मुलींची लग्न लावून आमची जमीन बळकावत आहेत. यासोबतच ते समृद्ध आदिवासी संस्कृती नष्ट करत आहेत. गृहमंत्री म्हणाले की, ‘जर असेच चालू राहिले तर येणाऱ्या काळात हे लोक बहुसंख्य होतील. काँग्रेस आणि हेमंत सोरेन त्यांना रोखणार नाहीत, कारण हे लोक व्होट बँकेचे राजकारण करतात. आम्हाला एकदा सत्ता द्या आणि आम्ही सर्व घुसखोरांना हुसकावून लावू. संथाल परगणा विभागातील आदिवासी लोकसंख्या ४४ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर आली असल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला.
भारतात २ कोटी अवैध बांगलादेशी Bangladeshi intruders ।
वास्तविक, बांगलादेशची भारतातील अनेक राज्यांशी सीमा सामायिक आहे, त्यामुळे भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरी हा बराच काळ राजकीय मुद्दा आहे. भारतात राहणाऱ्या बांगलादेशींच्या संख्येबाबत अनेकदा वाद झाले आहेत. 2016 मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या संख्येबाबत आकडेवारी सादर केली होती. ते म्हणाले होते की, ‘उपलब्ध माहितीनुसार सुमारे 2 कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात राहत आहेत.’





